महाराष्ट्र

ठाकरेंकडे बेहिशोबी संपत्तीचा आरोप; गौरी भिडेंची याचिका फेटाळली

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : उध्दव ठाकरे यांच्यावर बेहिशेबी मालमत्तेचा आरोप करत गौरी भिडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. यामुळे ठाकरे कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे. याचवेळी गौरी भिडे यांना धक्का देत 25 हजारांचा दंडदेखील ठोठावला आहे.

गौरी भिडे यांनी उध्दव ठाकरेंविरोधात जनहित याचिका दाखल केली होती. यात, उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या उत्पन्नाचा व संपत्तीचा ताळमेळ लागत नाही. यामुळे याची सीबीआय आणि ईडीमार्फत चौकशी केली जावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांची संपत्ती भ्रष्टाचार आणि गैरमार्गाने जमा केलेली बेहिशेबी मालमत्ता आहे. याविरोधात ११ जुलै २०२२ ला मुंबई पोलीस आयुक्तांकडे पत्र लिहून आम्ही तक्रारही केली आहे, असेही याचिकाकर्त्यानी म्हंटले होते.

Devendra Fadnavis : कार्यकर्त्यांची नाराजी अनेकवेळा असते, आम्ही सगळे मिळून ती नाराजी दूर करु

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा; कांद्यावरील निर्यातबंदी हटवली

नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात; राज ठाकरेंची आज कणकवलीत सभा

Daily Horoscope 4 May 2024 Rashi Bhavishya: 'या' राशींच्या लोकांचे वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस ; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 4 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना