महाराष्ट्र

दत्ता सामंत हत्येप्रकरणी छोटा राजनची निर्दोष सुटका

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : कामगार नेते दत्ता सामंत यांच्या हत्येप्रकरणी मुंबईतील सीबीआय न्यायालयाने आज कुख्यात गुंड छोटा राजनची सुटका केली. सीबीआयचे विशेष न्यायमूर्ती ए.एम. पाटील यांनी पुराव्याअभावी छोटा राजनची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली.

फिर्यादीनुसार, १६ जानेवारी १९९७ रोजी डॉ. सामंत हे पवईहून घाटकोपर येथील पंतनगरकडे जात होते. यादरम्यान पद्मावती रोडवरील नरेश जनरल स्टोअरजवळ त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. राजनने हत्येचा कट रचल्याचा दावा फिर्यादी पक्षाने केला होता. परंतु, राजनने कट रचला हे सिद्ध करण्यासाठी रेकॉर्डवर काहीही नाही, असे न्यायालयाने म्हंटले आहे. महत्त्वाचे साक्षीदार फितुर झाले. आरोपींवरील आरोप सिद्ध करण्यासाठी इतर साक्षीदारांची साक्ष पुरेशी नाही. मात्र, वेगवेगळ्या शहरांमध्ये डझनभर खटले सुरू असल्याने या राजनची तुरुंगातून लवकरच सुटका होण्याची शक्यता नाही.

पोलिसांनी सांगितले की, मोटारसायकलवरून आलेल्या चार अज्ञात आरोपींनी डॉ. सामंत यांची गाडी अडवली आणि त्यांच्यावर 17 गोळ्या झाडल्या. यानंतर हे लोक येथून पळून गेले. सामंत यांचा चालक भीमराव सोनकांबळे यांच्या तक्रारीवरून इस्को सेकर साकीनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, छोटा राजनला ऑक्टोबर 2015 मध्ये बाली, इंडोनेशिया येथून अटक करण्यात आली होती. यानंतर सीबीआयने राजनवर दाखल असलेले सर्व गुन्हे ताब्यात घेतले. त्यानंतर सामंत खून प्रकरणात सीबीआयने राजनवर खटला चालवला

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...