महाराष्ट्र

भिवंडीत दगड खदाणीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू

भोईवाडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अभिजीत हिरे | भिवंडी : अवकाळी पावसाने दगड खदाणीत साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोघा लहान मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना भिवंडी परिसरात घडली आहे. सत्यम पन्नीलाल चौरसिया (वय 9.5) व शुभम जितेंद्र चौरसिया (वय 14, दोघे रा.नारपोली) असे मयत मुलांची नावे आहेत. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

माहितीनुसार, सत्यम व शुभम हे दोघे आपल्या इतर मित्रांसह मंगळवारी दुपारी कालवार गावाच्या हद्दीतील दगड खदानमध्ये अवकाळी पावसाने साचलेल्या डबक्यात पोहण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्याने हे दोघे बुडले. सायंकाळी चार वाजले तरी मुले घरी न आल्याने कुटुंबियांनी परिसरात शोध घेतला. परंतु, ती मुले न सापडल्याने मुलांच्या हरविल्याची तक्रार भोईवाडा पोलिसांकडे नोंदविली होती.

बुधवारी सकाळी खदान येथील डबक्यात मुलांचे मृतदेह आढळून आल्याने त्याची माहिती मिळताच पोलिसांनी दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. या प्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा