Ajit Pawar - Sharad Pawar Team Lokshahi
ताज्या बातम्या

"ऊसाला पाणी जास्त लागतं, त्याऐवजी शेतकऱ्यांनी..."; अजित पवारांचा सल्ला

शरद पवार यांनी ऊस हे आळशी लोकांचं पीक असल्याचं विधान केलं होतं.

Published by : Sudhir Kakde

पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या एका वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीका झाली होती. ऊसाचं पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांना दिलेल्या सल्ल्याने त्यांना टीकेला सामारं जावं लागलं होतं. त्यानंतर आता अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील ऊसाबद्दल आपलं व्यक्त केलं आहे. ऊसाला पाणी अधिक लागत असल्यानं त्याऐवजी सोयाबीन किंवा इतर चांगले उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांना वळवण्याची गरज आहे. कृषी विभागानं त्यादृष्टीनं प्रयत्न करावेत असा सल्ला अजित पवार यांनी दिला आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनीही ऊस हे आळशी लोकांचं पिक असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता अजित पवार यांनीही असंच विधान केल्यानं त्यांच्या या विधानावर नेमक्या काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांनी आज खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीनंतर ही माहिती दिली आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी आणि कृषी निविष्ठांचा पुरेसा पुरवठा करावा, असे निर्देश खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीत संबंधितांना दिले. ऊस तोडणीसाठी मनुष्यबळ कमी असल्यानं गाळप बंद झालेल्या कारखान्यांकडील हार्वेस्टर इतर क्षेत्रातील ऊसतोडणीसाठी उपलब्ध करून देण्याबाबत विचार करण्यात येत आहे असंही अजित पवार यांनी सांगितला.

शेतात उभ्या असलेल्या ऊसाच्या वाहतुकीसाठी आणि एकरी तोटा भरून काढण्यासाठी राज्य शासनातर्फे सहकार्य करण्यात येत आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना खतांची कमतरता भासू दिली जाणार नाही असं आश्वासन अजित पवार यांनी दिलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा