माजी गृहमंत्री देशमुख खासगी दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अनिल देशमुख म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टार्गेट करण्यात येत आहे, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. राजकारणात विरोध राहतो. मात्र, एजन्सीचा गैरवापर करून काही लोकांना चौकशीसाठी बोलवायचे, तुरुंगात टाकायचे, असे प्रकार सुरू आहेत.खोटे आरोप करायला लावून चौकशी सुरू करायला लावायचा उद्योग राज्यात सुरू आहे. संजय राऊत यांनाही तुरुंगात टाकण्यात आले. मध्यंतरी हसन मुश्रीफ यांच्या मागे लागले. आता जयंत पाटील.
तसेच ते म्हणाले की, मला खोट्या आरोपात अडकविण्यात आले. माझा छळ करण्यात आला.माझ्यावर तर शंभर कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला. हा केवळ राजकीय विरोधकांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. असे देशमुख म्हणाले.