ताज्या बातम्या

'...भाजपकडून तेवढा त्रास होतो' बच्चू कडूंचा खळबळजनक आरोप

Published by : shweta walge

प्रहार जनशक्ती पक्षा'चे अध्यक्ष आमदार बच्चू कडूंनी अकोल्यात भाजपवर गंभीर आरोप केला आहे. आपल्या मतदारसंघात भाजप आपल्याला त्रास देत असल्याचा आरोप बच्चू कडूंनी भाजपवर केला आहे. भाजपने आपल्यासोबत उभं राहणाऱ्यांची फिल्डिंग लावण्याचे धंदे बंद करावेत, असा थेट हल्लाबोल बच्चू कडू यांनी केला आहे.

काय म्हणाले बच्चू कडू?

आपल्या मतदारसंघात भाजप आपल्याला त्रास देत असल्याचा गंभीर आरोप बच्चू कडूंनी भाजपवर केला आहे. आपल्या मतदारसंघात काँग्रेस आणि इतर पक्षांचा आपल्याला त्रास नाही. मात्र, भाजपचं आपल्याला त्रास देत असल्याचा खळबळजनक आरोप कडूंनी भाजपवर केला. मात्र, आपण त्याची काळजी करत नसल्याचं बच्चू कडूंनी ठणकावले आहे. आपल्याला त्रास देण्यासाठी भाजपनं आणखी दोन आमदार, तीन खासदार लावावेत असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे. याला आपण घाबरणार नसल्याचे ही बच्चू कडू यांनी म्हटले.

निवडणूक आयोगाला फटकारणाऱ्या उद्धव ठाकरेंना उपमुख्यमंत्री फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर, ट्वीटरवर म्हणाले, "त्यांचा पराभव स्पष्टपणे..."

Daily Horoscope 21 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांच्या धन-संपत्तीत होणार बक्कळ वाढ; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 21 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

"मोदी पराभवाच्या भीतीमुळं निवडणूक आयोगाचा वापर घरगड्यासारखा करतात"; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

IPL 2024 Play Offs : प्ले ऑफचा सामना पावसामुळं रद्द झाल्यास पुढे काय होणार? जाणून घ्या सविस्तर माहिती