Water Tap Team Lokshahi
ताज्या बातम्या

मुंबईकरांनो, पाणी उकळून प्या; जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी पिण्यासाठी अयोग्य...

तीन चार दिवसात पाणी पूर्वीप्रमाणे पूर्ववत होईल.

Published by : Vikrant Shinde

मुंबईकरांना यंदा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही. याचं कारण म्हणजे मुंबईला पाणीपुरवठा होणाऱ्या तलावांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यानं यंदा मुंबईकरांसाठी मुबलक पाणीसाठा झालेला आहे. दरम्यान, या तलावांच्या परिसरात जोरदार पाऊस झाल्यानं मुंबईकरांना वेगळीच समस्या भेडसावणार आहे. अतिवृष्टी झाल्यामुळे धरणा मधून पाईपलाईन मधून येणाऱ्या पाण्यामध्ये गडूळपणा वाढला आहे.

मुंबई महानगरपालिकेचे पाणी उकळून पिण्याचे आवाहन:

'मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाल्यामुळे धरणा मधून पाईपलाईन मधून येणाऱ्या पाण्यामध्ये गडूळपणा वाढला आहे. तथापि सदर पाणी जलशुद्धीकरण केंद्रातून शुद्ध करण्यात येत असून पिण्यासाठी पूर्णपणे योग्य नाही. तरी नागरिकांना आवाहन करण्यात येतं की त्यांनी पिण्याचे पाणी उकळून गाळून प्यावे. तीन चार दिवसात पाणी पूर्वीप्रमाणे पूर्ववत होईल.' असं आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा