Admin
Admin
ताज्या बातम्या

जिचं अपहरण करुन हत्या केल्याप्रकरणी त्याने 7 वर्ष तुरुंगात काढली, ती जिवंत निघाली

Published by : Siddhi Naringrekar

7 वर्षानंतर हत्या झालेली मुलगी जिवंत सापडली आहे. अशी धक्कादायक घटना समोर आली आहे. 7 फेब्रुवारी 2015 दहावीत शिकणारी एक विद्यार्थीनी बेपत्ता झाली. अनेक महिने मुलीचा शोध सुरु होता, पण मुलीचा काही थांगपत्ता लागला नाही. अखेर सप्टेंबर महिन्यात एका संशयास्पद मृतदेह पोलिसांना आढळून आला.

हा मृतदेह ओळखूही येत नव्हता. या मृतदेहावर असलेल्या कपड्यांच्या आधारे तिची ओळख पटवण्यात आली होती. हा मृतदेह आपल्याच मुलीचा आहे, असं हरवलेल्या मुलीच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलं. त्यानंतर विष्णू नावाच्या एका तरुणावर त्यांनी मुलीची हत्या केल्याचा आरोप केला. विष्णूने आपल्या मुलीचं फूस लावून तिचं अपहरण केलं आणि नंतर तिची हत्या केली, असा आरोप करण्यात आला. या आरोपांनुसार पोलिसांनी चार्जशीट तयार केली. 25 सप्टेंबर रोजी आरोपपत्र दाखल करत पोलिसांनी त्याला तुरुंगात टाकले.

अखेर ज्या मुलीची हत्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता, तिला जिवंत पाहून सगळेच चक्रावले.आपल्या मुलाला फसवून त्याला जेलमध्ये अडकवण्यात आलं आहे, असं त्याच्या आईने म्हटलं. विष्णूच्या आईचं नाव सुनिता. सुनिता यांनी पोलिसांनी वारंवार याबाबत सांगितलं. पण अखेर त्यांनाच हरवलेल्या मुलीची हत्या झाली नसून ती जिवंत आहे, हे कळलं. त्यांनी मुलीचा शोध घेतला. ती मुलगी तर लग्न करुन पत्नी आणि दोन मुलांसह आनंदाने संसार करतेय, ही माहिती समोर आली आहे. आता पोलिसांनी या मुलीला अटक केली आहे. तसंच तिला कोर्टासमोर हजर केल्यानंतर लवकरच तिची रवानगी तुरुंगात केली जाईल. असे पोलिसांनी सांगितले आहे.

India Post Recruitment: सरकारी नोकरी शोधताय? भारतीय डाक विभागात 'या' पदासाठी भरती प्रक्रिया चालू...

"महाराष्ट्रात ५० वर्ष आत्मा फिरतोय", नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर शरद पवारांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, "अब तक ५६..."

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना अंतरिम दिलासा नाहीच

Mumbai Water Supply : मुंबईकरांवरील पाणीकपातीचं संकट तूर्तास टळलं, पाणी जपून वापरण्याचे आवाहन

"महिलांचा विचार करणारे नरेंद्र मोदी देशातील पहिले पंतप्रधान", उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान