ताज्या बातम्या

ऐन श्रावणात डाळींपाठोपाठ कडधान्यांच्या किमतीत वाढ

श्रावणातील सणांच्या तोंडावरच डाळी, कडधान्याच्या भावामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे गृहणींसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. महागाईमुळे तर सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. वाशीतील घाऊक अन्नधान्य बाजारात डाळींच्या दरात किलोमागे ५ ते १० रुपयांची वाढ झाली आहे.

Published by : Team Lokshahi

श्रावणातील सणांच्या तोंडावरच डाळी, कडधान्याच्या भावामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे गृहणींसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. महागाईमुळे तर सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. वाशीतील घाऊक अन्नधान्य बाजारात डाळींच्या दरात किलोमागे ५ ते १० रुपयांची वाढ झाली आहे.

तूरडाळीचा भाव सर्वाधिक वाढला असून, किलोमागे ती २० ते ३० रुपयांनी महागली आहे. याशिवाय बटाटा, साबुदाणा, शेंगदाण्याच्या भावातही वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात भाज्यांची ४० टक्क्यांनी दरवाढ झाली आहे तर फळांचे दरही २० टक्क्यांनी वाढले आहेत. दुसरीकडे पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्याचे भावसुद्धा गगनाला भिडले आहेत.

किरकोळ बाजारात भेंडी, गवार, शिमला मिरची आणि घेवडा या भाज्यांचे दर थेट शंभरी पार पोहोचले आहेत.

तूरडाळ : १०० ते १४०-१४५

मुगडाळ : १०४ ते १२०

चणाडाळ : ७० ते ८०

मसूर डाळ : ९६-११२

कडधान्याचे भाव (रुपयांत)

मूग : १०० ते १२०

मटकी : १०० ते १४०

चणे : ६८ ते ७२

वाटाणा : ६० ते ८०

काबुली चणे : ९० ते १२०

वाल : १८० ते १९०

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ashadhi Ekadashi 2025 : विठ्ठल-रखुमाईच्या शासकीय महापुजेसाठी आज मुख्यमंत्री सपत्नीक पंढरपुरात दाखल होणार; कार्यक्रम ठरला, वाचा सविस्तर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा विजयी मेळावा; ठाकरे बंधू काय बोलणार? साऱ्यांचं लक्ष

Latest Marathi News Update live : मनसे - शिवसेनेचा आज मुंबईत विजयी मेळावा

आजचा सुविचार