ताज्या बातम्या

ऐन श्रावणात डाळींपाठोपाठ कडधान्यांच्या किमतीत वाढ

Published by : Team Lokshahi

श्रावणातील सणांच्या तोंडावरच डाळी, कडधान्याच्या भावामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे गृहणींसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. महागाईमुळे तर सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. वाशीतील घाऊक अन्नधान्य बाजारात डाळींच्या दरात किलोमागे ५ ते १० रुपयांची वाढ झाली आहे.

तूरडाळीचा भाव सर्वाधिक वाढला असून, किलोमागे ती २० ते ३० रुपयांनी महागली आहे. याशिवाय बटाटा, साबुदाणा, शेंगदाण्याच्या भावातही वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात भाज्यांची ४० टक्क्यांनी दरवाढ झाली आहे तर फळांचे दरही २० टक्क्यांनी वाढले आहेत. दुसरीकडे पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्याचे भावसुद्धा गगनाला भिडले आहेत.

किरकोळ बाजारात भेंडी, गवार, शिमला मिरची आणि घेवडा या भाज्यांचे दर थेट शंभरी पार पोहोचले आहेत.

तूरडाळ : १०० ते १४०-१४५

मुगडाळ : १०४ ते १२०

चणाडाळ : ७० ते ८०

मसूर डाळ : ९६-११२

कडधान्याचे भाव (रुपयांत)

मूग : १०० ते १२०

मटकी : १०० ते १४०

चणे : ६८ ते ७२

वाटाणा : ६० ते ८०

काबुली चणे : ९० ते १२०

वाल : १८० ते १९०

"उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्रिपद हिरावून घेतलं, म्हणून..." कणकवलीत नारायण राणेंच्या सभेत 'राज'गर्जना

पत्नीसोबत अनैसर्गिक सेक्स बलात्कार नाही, तिच्या संमतीचीही आवश्यकता नाही; उच्च न्यायालयाचा निर्णय

टी-२० वर्ल्डकपमध्ये 'इॅम्पॅक्ट प्लेयर'चा नियम नाही, दिग्गज खेळाडू म्हणाला, "कर्णधाराची वेगळी रणनीती..."

साताऱ्यात देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले, " उदयनराजेंनी जी कामे हातात घेतली..."

"...म्हणून मी तुमच्याकडे मत मागायला आलोय", साताऱ्याच्या सभेत अजित पवारांनी सांगितलं खरं कारण