BCCI : ललित मोदींची याचिका सर्वोच्च न्यायालयात फेटाळली; BCCI दंड भरण्यास नकार BCCI : ललित मोदींची याचिका सर्वोच्च न्यायालयात फेटाळली; BCCI दंड भरण्यास नकार
ताज्या बातम्या

BCCI : ललित मोदींची याचिका सर्वोच्च न्यायालयात फेटाळली; BCCI दंड भरण्यास नकार

ललित मोदींची याचिका सर्वोच्च न्यायालयात फेटाळली; BCCI दंड भरण्यास नकार.

Published by : Team Lokshahi

आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका सोमवारी (30 जून) फेटाळण्यात आली. या याचिकेत मोदी यांनी मागणी केली होती की, सक्तवसुली संचालनालयाने (ED) परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) अंतर्गत ठोठावलेला ₹10.65 कोटींचा दंड बीसीसीआयने (BCCI) भरावा.

न्यायमूर्ती पी.एस. नरसिम्हा आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. कोर्टाने स्पष्ट केलं की बीसीसीआय ही संस्था राज्यघटनेच्या कलम 12 अंतर्गत ‘राज्य’ (State) म्हणून ओळखली जात नाही. त्यामुळे बीसीसीआयवर संविधानाच्या कलम 226 अंतर्गत रिट अधिकार लागू होत नाही. मात्र, मोदी हे इतर नागरी कायद्यानुसार उपाय शोधू शकतात, असं कोर्टाने स्पष्ट केलं.

ललित मोदी यांनी यापूर्वी हीच याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. डिसेंबर २०२३ मध्ये ती याचिका फेटाळून न्यायालयाने त्यांना 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता आणि तो टाटा मेमोरियल रुग्णालयाला देण्याचे आदेश दिले होते. मुंबई उच्च न्यायालयाने याचिकेला "निरर्थक आणि कायदेशीरदृष्ट्या चुकीची" ठरवलं होतं.

मोदींचं म्हणणं होतं की, बीसीसीआयचे ते तत्कालीन उपाध्यक्ष आणि आयपीएल उपसमितीचे अध्यक्ष असल्याने बीसीसीआयने त्यांच्या वतीने दंड भरावा. मात्र, न्यायालयाने त्यांचा दावा फेटाळत स्पष्ट केलं की FEMA अंतर्गत लावलेला दंड वैयक्तिक स्वरूपाचा आहे आणि त्याला BCCI जबाबदार धरता येणार नाही.

हेही वाचा...

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

Monorail : मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार; MMRDAने घेतला महत्त्वाचा निर्णय

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा