राजकारण

रवी राणा-बच्चू कडू यांना सत्तारांचा सल्ला; दोघांचाही छोटा पक्ष...

Published by : Shweta Shigvan-Kavankar

विकास माने | परभणी : राज्याच्या राजकारणात आमदार रवी राणा विरुद्ध आमदार बच्चू कडू असा वाद चांगलाच पेटला असल्याचं पाहायला मिळतंय. कडू व राणा या दोघांकडूनही एकमेकांवर जोरदार हल्लाबोल सुरू आहे. यावर राजकीय प्रतिक्रिया येत असून कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनीही मत मांडले आहे. रवी राणा व बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे, असा सल्ला सत्तारांनी दिला आहे.

अब्दुल सत्तार सध्या परभणी दौऱ्यावर असून नुकसानग्रस्त भागांची पाहणी करत आहेत. यावेळी त्यांनी राणा-कडू वादावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, दोघांचाही छोटा पक्ष आहे. काय निर्णय घ्यावं दोघांनी ठरवावे. दोघांनी मिळून संकटाच्या काळात महाराष्ट्राकडे लक्ष द्यावं. शेकऱ्यांकडे लक्ष द्यावं, असा सल्ला त्यांनी राणा-कडू यांना दिला आहे.

तसेच, राज्यभरात शेतकऱ्यांची परिस्थिती विदारक आहे. जुलै, ऑगस्ट अतिवृष्टी पिकांचे नुकसान झाले आहे. परत परतीच्या पावसात देखील पिकांचे नुकसान झाले. परंतु. राज्यातला एकही शेतकरी नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता सरकार घेत आहे, अब्दुल सत्तार यांनी आढावा बैठकीत सांगितले आहे.

काय आहे रवी राणा व बच्चू कडू यांचा वाद?

बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांच्या किराणा वाटपावर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना आमदार रवी राणा यांनी गुवाहाटीमध्ये जाऊन त्यांनी कोटींचा व्यवहार केला, असा खळबळजनक गंभीर आरोप रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर केला होता. यावर बच्चू कडू यांनी थेट पोलीस स्टेशमनध्येच तक्रार दाखल केली होती. अखेर या दोघांमध्ये मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना मध्यस्थी करावी लागली असून दिवाळीनंतर एकत्र बैठक होणार असल्याची माहिती मिळत होती. परंतु, कडू आणि राणा यांच्यामधील वाद थांबायचे नाव घेत नसून आता बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राणांबाबत ठोस भूमिका घेतली नाही तर, आपण मोठा धमाका करु, असा इशाराच दिला आहे. यानंतर गुरुवारी पुन्हा एकदा रवी राणांनी बच्चू कडूंना डिवचले. दिवा जेव्हा विझतो तेव्हा तो फडफड करतो, त्यातला 'हा' एक दिवा आहे, दिवाळीत खूप फटाके फुटले त्यातला 'हा' फुसका फटाका आहे. असं ट्वीट राणा यांनी केलं आहे.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...