राजकारण

गुजरातला दोन मुख्यमंत्री, एक तिकडे आणि एक इकडे बसलेत; आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : आज महाराष्ट्र दिन आहे, गुजरातचा पण दिन आहे. त्यांना शुभेच्छा. केंद्राकडून महाराष्ट्राला दुय्यम वागणूक दिली जातेय, असा आरोप ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मोदी सरकारवर केली आहे. गुजरातचे दोन मुख्यमंत्री एक तिकडचे आणि एक इकडे बसलेत, अशी जोरदार टीका आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर केली आहे. वज्रमुठ सभेच्या सुरुवातीला आदित्य ठाकरे स्वागतपर भाषण केले. यावेळी ते बोलत होते.

आज महाराष्ट्र दिन आहे, गुजरातचा पण दिन आहे. त्यांना शुभेच्छा. पण, गुजरातचे काय भाग्य आहे बघा. केंद्र सरकार जे काही देतंय ते गुजरातला देतंय. महाराष्ट्राला दुय्यम वागणूक दिली जातेय. गुजरातचे दोन मुख्यमंत्री एक तिकडचे आणि एक इकडे बसलेत, अशी जोरदार टीका आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर केली आहे. महाराष्ट्राला झुकवण्याचा प्रयत्न दिल्लीत होत आहे. पण हा महाराष्ट्र आहे. हा तुम्हाला वाकवेल पण झुकणार नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.

गेल्या 8-10 महिन्यात महाराष्ट्र अंधारात गेला आहे. या अंधारातून आपल्याला महाराष्ट्राला बाहेर काढायचं आहे. कोरोना काळातही आमच्या सरकारमध्ये लाखोंची गुंतवणूक आणली. कोरोना काळात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा, बाळासाहेब थोरात आणि सर्व मविआच्या नेते काम करत होते. या सरकारमध्ये मुंबईचे कोणी मंत्री नाहीत. स्क्वेअर फूट विकणारे आहेत पण इंच इंच जाणणारे नाहीत. हे घटनाबाह्य सरकार जाणार म्हणजे जाणारच, असे पुर्नच्चार त्यांनी केला आहे.

"परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान "; ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करत आमदार रोहित पवारांनी केले गंभीर आरोप

IPL 2024 : अभिषेक-क्लासेनचा झंझावात! वादळी खेळी करून पंजाब किंग्जचा उडवला धुव्वा, हैदराबादचा दमदार विजय

"पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणाऱ्या उबाठाच्या उमेदवारांवर कारवाई करा"; किरण पावसकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल

IPL 2024 : आरसीबीने CSK विरोधात रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' कारनामा करणारा ठरला पहिला संघ

"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीनेच बाजी मारलीय"; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा दावा