राजकारण

ठाकरे गट व वंचित भविष्यात वेगळे होतील; बच्चू कडूंचे भाकीत

Published by : Shweta Shigvan-Kavankar

बालाजी सुर्वे | उस्मानाबाद : शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात काही दिवसांपुर्वीच युती झाली आहे. या युतीमुळे आता राज्यातील राजकीय समीकरण बदलतील असे संकेत वर्तवण्यात येत आहे. परंतु, ठाकरे गट व वंचित भविष्यात ते वेगळे होतील, असा दावा प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. बच्चू कडू हे आज उस्मानाबादला आले होते. यावेळी ते बोलत होते.

शिवसेना ठाकरे गट आणि वंचित हे एकत्र आले असले तरी उद्या ते वेगळे होतील. वंचित-शिवसेना यांचे कुठले मुद्दे ठरले आहेत का? भगवा हातात घ्यायचा की निळा की हिरवा कोणता रंग घ्यायचा ते काहीच ठरले नाही. त्यामुळे जेव्हा अंतर्मनातील रंग बाहेर येईल तेव्हा हे सगळे बेरंगवाले तुटून जाईल, असे बच्चू कडू यांनी म्हंटले आहे.

विद्यमान सरकारमध्ये आपण नाराज नसल्याचे आमदार बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे. मी शेतकऱ्यांबद्दल बोलत असतो, वस्तुस्थिती सांगतो. त्यामुळे नाराज आहे हे सांगणं चुकीचे असल्याचा निर्वाळा बच्चू कडू यांनी दिला. तसेच, केंद्राचा अर्थसंकल्प हिंदी भाषेत मांडला जावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

"तुतारीची आता पिपाणी करायची आहे"; फलटणच्या सभेत उपमुख्यमंत्री फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल

अलिबागच्या सभेत उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर निशाणा, म्हणाले; "एकनाथ खडसेंचा मला फोन आला आणि..."

"छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला पण आज परिस्थिती बदलली"; शरद पवारांचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा

"३७० कलम हटवलं पण दहशतवाद अजून संपला नाही", सांगलीच्या सभेत आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

“..तर पुढच्या वेळी आम्हाला काळे झेंडे दाखवा”, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भोरच्या सभेत स्पष्टच सांगितलं