Pruthviraj Chavan
Pruthviraj Chavan Team Lokshahi
राजकारण

देशाचे विभाजन करण्याचा मोदी सरकारचा डाव, पृथ्वीराज चव्हाण यांचा केंद्र सरकारवर निशाणा

Published by : Sagar Pradhan

राज्यात राजकीय घडामोडी घडत असताना, अनेक विषयावरून राजकारण तापले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. देशाचे विभाजन करण्याचा मोदी सरकारचा डाव असल्याचा गंभीर आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. मोदी सरकार देशात जातीयता, धर्मांधतेचे विष पेरतंय असा आरोपही यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

काय म्हणाले चव्हाण?

पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदी सरकारचा देशाचे विभाजन करण्याचा डाव आहे. केंद्र सरकारकडून देशात जातीयता, धर्मांधतेचे विष पेरले जात आहे. आम्ही विरोधी पक्षात मग मोदीचे कौतुक का करायचे? मी टीका करत राहीन असे ते म्हणाले.

पुढे बोलताना चव्हाण यांनी शिंदे- फडणवीस यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्याचा दौरा करणार आहेत, सोबत अयोध्येला पण जाणार आहेत ही चांगली गोष्ट आहे, राज्याचा दौरा केला पाहिजे. राज्यातील जनेतची दु:ख समजून घेतली पाहिजेत. राज्यात ओला दुष्काळ आहे, मदत केली पाहिजे. राज्यात जर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री फिरत असतील तर चांगली गोष्ट आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री यांच्यावर दौऱ्यावर दिली आहे.

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना अंतरिम दिलासा नाहीच

Mumbai Water Supply : मुंबईकरांवरील पाणीकपातीचं संकट तूर्तास टळलं, पाणी जपून वापरण्याचे आवाहन

"महिलांचा विचार करणारे नरेंद्र मोदी देशातील पहिले पंतप्रधान", उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

बिगबॉस फेम वीणा जगताप करणार ‘रमा राघव’ मालिकेत एन्ट्री

Sanjay Raut On PM Modi: "खोटं बोलण्याची स्पर्धा जगात लावली तर ऑलिम्पिकला नरेंद्र मोदीला गोल्डमॅडल मिळाले पाहिजे"