Rahul Gandhi | RSS
Rahul Gandhi | RSS Team Lokshahi
राजकारण

21 व्या शतकातले कौरव हाफ पँट घालतात, राहुल गांधींचा संघावर निशाणा

Published by : Sagar Pradhan

काँग्रेसची सध्या संपूर्ण भारतात भारत जोडो यात्रा सुरु आहे. त्या यात्रेचा नेतृत्व राहुल गांधी हे करत आहे. त्यामुळे ते प्रचंड चर्चेत येत आहेत. नागरिकांचा देखील या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. सध्या ही भारत जोडो यात्रा हरियाणात आहे. त्यावेळी आजच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे.

नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?

२१ व्या शतकातले कौरव कोण आहेत तुम्हाला माहित आहेत का? २१ व्या शतकातले कौरव हाफ पँट घालतात आणि शाखेत उपस्थिती लावतात. त्यांच्या हातात लाठी असते. त्यांच्या बाजूने देशातले दोन ते तीन अब्जाधीश या कौरवांच्या बाजूने आहेत. असं म्हणत राहुल गांधी यांनी संघावर टीका केली आहे.

पुढे ते म्हणाले की, संघाच्या लोकांची घोषणा तुम्ही ऐका ते कधीही हर हर महादेव म्हणत नाहीत. कारण भगवान शंकर हे तपस्वी होते. मात्र हे लोक भारताच्या तपस्येवर हल्ला करत आहेत. त्यांनी जय सीताराम या घोषणेतून सीता मातेला एकदम शिताफीने वगळलं. त्यांनी जय श्रीराम ची घोषणा देऊन दहशत पसरवली. हे लोक भारताच्या संस्कृतीच्या विरोधात काम करत आहेत. असे विधान देखील त्यांनी यावेळी केले आहे.

टी-२० वर्ल्डकपमध्ये 'इॅम्पॅक्ट प्लेयर'चा नियम नाही, दिग्गज खेळाडू म्हणाला, "कर्णधाराची वेगळी रणनीती..."

साताऱ्यात देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले, " उदयनराजेंनी जी कामे हातात घेतली..."

"...म्हणून मी तुमच्याकडे मत मागायला आलोय", साताऱ्याच्या सभेत अजित पवारांनी सांगितलं खरं कारण

IPL 2024 : चेन्नई आणि लखनऊ संघाला मोठा धक्का! स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर, प्ले ऑफचं स्वप्न भंगलं?

टी-२० वर्ल्डकपआधी भारताच्या अडचणी वाढल्या, कर्णधार रोहित शर्माला दुखापत, 'या' खेळाडूनं दिली मोठी अपडेट