Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Team Lokshahi
राजकारण

दगडाला सोन्याची नाणी तर नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा; फडणवीसांचा ठाकरेंना टोला

Published by : Team Lokshahi

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत पुन्हा एकदा पाणी प्रश्नावरुन राजकारण तापू लागले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात आज भाजपचा जलआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जलआक्रोश मोर्चा संभाजीनगरच्या इतिहासातला सर्वात अभूतपूर्व मोर्चा आहे. आजची लढाई सत्तेसाठी नसून व्यवस्था परिवर्तनाची लढाई आहे. आम्ही संघर्ष सुरु केला आहे आणि जोपर्यंत संभाजीनगरमध्ये पाणी पोहचत नाही. तोपर्यंत सरकारला रात्री स्वस्थ झोपू देणार नाही. असा निर्धात त्यांनी बोलून दाखवला.

आपल्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करताना फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्र्यांना सांगितले की पाणी येत नाही तर ते त्याच्यावर काहीच करायला तयार नाही. ते म्हणतात मी म्हणतो म्हणून संभाजीनगर समजा, मी म्हणतो म्हणून बेफिकर समजा, दगडाला सोन्याची नाणी समजा आणि नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा, अशा प्रकारचे आश्वासन आमचे मुख्यमंत्री देतील. कारण ते म्हणतात ती काळ्या दगडावरची रेष आहे, अशी टीका फडणवीसांनी केली आहे.

हर गर्मी में संभाजीनगर की यही कहानी है, हलख में प्यास है और आंखों में पाणी है, ऊपरवाले तेरे से कोई गिला नही है ये तो निचेवाले तेरे बंदो की बेईमानी आहे, असा निशाणाही फडणवीसांनी शायरीतून शिवसेनेवर साधला.

निवडणूक आयोगाला फटकारणाऱ्या उद्धव ठाकरेंना उपमुख्यमंत्री फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर, ट्वीटरवर म्हणाले, "त्यांचा पराभव स्पष्टपणे..."

Daily Horoscope 21 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांच्या धन-संपत्तीत होणार बक्कळ वाढ; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 21 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

"मोदी पराभवाच्या भीतीमुळं निवडणूक आयोगाचा वापर घरगड्यासारखा करतात"; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

IPL 2024 Play Offs : प्ले ऑफचा सामना पावसामुळं रद्द झाल्यास पुढे काय होणार? जाणून घ्या सविस्तर माहिती