राजकारण

काही लोकांना प्रेतावर राजकारण करण्याची सवय; फडणवीसांचा निशाणा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात 15 श्री सदस्यांना उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. तर काही जणांवर उपचार सुरु आहेत. यावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. यावरुन लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2023' या विशेष कार्यक्रमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

खारघर घटना ही दुर्दैवी आहे. नियोजन करताना इतक्या उन्हाच्या झळा असतील असे वाटले नव्हते. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे म्हणणे होते आमच्या लोकांना दिवसा कार्यक्रमाची सवय आहे. तो कार्यक्रम नीट पार पडला असता तर हा प्रश्न निर्माण झाला नसता, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

उष्माघातामुळे हा प्रश्न निर्माण झाला. यामधून आपल्याला काही शिकायला मिळाले. पुढील काळात नियोजन करताना ध्यानात ठेवावी लागेल. ही घटना दुर्दैवाने घडली. काही लोकांना प्रेतावर राजकारण करण्याची सवय आहे ती बंद झाली पाहिजे, अशी जोरदार टीकाही फडणवीसांनी विरोधकांवर केली आहे.

आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राजकारणासाठी हा पुरस्कार दिला, अशी टीका विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर केली होती. याला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे. नानासाहेब धर्माधिकारी यांना काँग्रेस व राष्ट्रवादी काळातही कार्यक्रम झाला. तेव्हाही गर्दी होती. तेव्हा राजकारणासाठी हा पुरस्कार दिला का? ही दुटप्पी भूमिका आहे, असाही पलटवार त्यांनी केला आहे.

"भाजप सरकारच्या नादानपणामुळे भारतीय सैनिकांवर हल्ला झाला"; 'मशाल' पेटवून उद्धव ठाकरेंचं PM मोदींवर शरसंधान

IPL 2024 : धरमशाला मैदानात चेन्नई बनला सुपर 'किंग'! पंजाबचा केला दारुण पराभव

"तुतारीची आता पिपाणी करायची आहे"; फलटणच्या सभेत उपमुख्यमंत्री फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल

अलिबागच्या सभेत उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर निशाणा, म्हणाले; "एकनाथ खडसेंचा मला फोन आला आणि..."

"छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला पण आज परिस्थिती बदलली"; शरद पवारांचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा