राजकारण

गारपिटीमुळे लग्नात आले विघ्न! नियोजित लग्नावर अवकाळी पावसाने सावट

Published by : Shweta Shigvan-Kavankar

गोपाल व्यास | वाशिम : जिल्ह्यात लग्नाची मोठी लगबग सुरू आहे. त्यातच आज दुपारच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली. यामुळे मानोरा तालुक्यातील चिखली येथील लग्न मंडळींची एकच धांदल उडाली. मंडपाचे देखील नुकसान झाले.

जिल्ह्यात आज दुपारपर्यंत चांगलेच ऊन तापले होते. परंतु, दुपार नंतर अचानक अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. मानोरा तालुक्यात जोरदार गारपीट झाली. तालुक्यातील चिखली येथे सुरू असलेल्या एका विवाह सोहळ्यावर गारपिटीने विघ्न आणले. विवाह सोहळा सुरू असताना अचानक वादळी पाऊस व गारपीट सुरू झाली. त्यामुळे वऱ्हाडी मंडळींची एकच ताळांबर उडाली.

तर लग्न मंडपात गारांचा खच साचला होता. यामधे मंडपाचे नुकसान झाले. वऱ्हाडी मंडळींनी पाणी पासून बचाव करण्यासाठी गाद्या घेऊन पळापळ केली. जिल्ह्यात लग्नाची एकच धामधूम असताना अवकाळी पावसामुळे मात्र सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे.

"उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्रिपद हिरावून घेतलं, म्हणून..." कणकवलीत नारायण राणेंच्या सभेत 'राज'गर्जना

पत्नीसोबत अनैसर्गिक सेक्स बलात्कार नाही, तिच्या संमतीचीही आवश्यकता नाही; उच्च न्यायालयाचा निर्णय

टी-२० वर्ल्डकपमध्ये 'इॅम्पॅक्ट प्लेयर'चा नियम नाही, दिग्गज खेळाडू म्हणाला, "कर्णधाराची वेगळी रणनीती..."

साताऱ्यात देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले, " उदयनराजेंनी जी कामे हातात घेतली..."

"...म्हणून मी तुमच्याकडे मत मागायला आलोय", साताऱ्याच्या सभेत अजित पवारांनी सांगितलं खरं कारण