राजकारण

टी-20 वर्ल्डकपसाठी इंग्लड-पाकिस्तानमध्ये आज लढत

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : टी-20 विश्वचषक 2022 चा अंतिम सामना आज इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. या सामन्याकडे जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. पाकिस्तानने न्यूझीलंडचा सात गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली होती. तर, दुसरीकडे इंग्लंडने एकतर्फी सामन्यात भारतीय संघाचा 10 गडी राखून पराभव केला होता. अंतिम सामना आज मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. परंतु, या सामन्यावर पावसाचे सावट आहे.

अंतिम सामन्यावरही पावसाचा धोका निर्माण झाला आहे. मेलबर्नमध्ये रविवारी पावसाची 95 टक्के शक्यता आहे, 25 मिमी पर्यंत पाऊस. पाऊस पडलाच तर रिझर्व्ह डेही ठेवण्यात आले आहे. मात्र दुर्दैवाने 'राखीव दिवशी'ही पावसाची 95 टक्के शक्यता असून पाच ते 10 मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पावसामुळे राखीव दिवसातही निकाल लागला नाही, तर इंग्लंड आणि पाकिस्तानला संयुक्त विजेता घोषित केले जाईल. उदाहरणार्थ, 2002 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि श्रीलंकेचा संघ संयुक्तपणे जिंकला होता.

आयसीसीच्या नियमांनुसार, डकवर्थ-लुईस नियमानुसार निकाल मिळविण्यासाठी T20 विश्वचषक प्लेऑफ सामन्यांमध्ये 10-10 षटके खेळणे आवश्यक आहे. जर पावसामुळे 10-10 षटकांचा खेळ पूर्ण होऊ शकला नाही, तर तो जिथे थांबला होता तिथून तो राखीव दिवशी सुरू होईल. एकदा नाणेफेक झाल्यानंतर सामना 'लाइव्ह' मानला जाईल.

दरम्यान, सध्याच्या टी-20 विश्वचषकात एकूण चार सामने पावसामुळे वाहून गेले. 28 ऑक्टोबरला आयर्लंड-अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया-इंग्लंड सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. त्याआधी दक्षिण आफ्रिका-झिम्बाब्वे आणि न्यूझीलंड-अफगाणिस्तान यांच्यातील सामनाही पावसामुळे अनिर्णित राहिला होता. एवढेच नाही तर आयर्लंडने डकवर्थ लुईस पद्धतीने झालेल्या सामन्यात इंग्लंडचा पराभव केला होता. त्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला नसता तर कदाचित इंग्लंडने सामना जिंकण्याची शक्यता होती.

"उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्रिपद हिरावून घेतलं, म्हणून..." कणकवलीत नारायण राणेंच्या सभेत 'राज'गर्जना

पत्नीसोबत अनैसर्गिक सेक्स बलात्कार नाही, तिच्या संमतीचीही आवश्यकता नाही; उच्च न्यायालयाचा निर्णय

टी-२० वर्ल्डकपमध्ये 'इॅम्पॅक्ट प्लेयर'चा नियम नाही, दिग्गज खेळाडू म्हणाला, "कर्णधाराची वेगळी रणनीती..."

साताऱ्यात देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले, " उदयनराजेंनी जी कामे हातात घेतली..."

"...म्हणून मी तुमच्याकडे मत मागायला आलोय", साताऱ्याच्या सभेत अजित पवारांनी सांगितलं खरं कारण