मुंबई: राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप अद्याप प्रलंबित आहे. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसाठी खाती सोडायला शिवसेनेचे मंत्री तयार नसल्याची माहिती समोर येतीये. यावर पक्षासाठी गरज पडल्यास सर्व खाती सोडण्याची तयारी मंत्री गिरीश महाजन यांनी लोकशाहीशी बोलताना व्यक्त केली आहे.