राजकारण

शेतकऱ्याची भन्नाट कल्पना! एका शाम्पूच्या पुडीने वाचवले लाखो रूपये व वन्य जीवांचे प्राण

Published by : Shweta Shigvan-Kavankar

सूरज दहाट | अमरावती : रान डुकर अनेकदा शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते. परंतु, एका शेतकऱ्याने यावर भन्नाट कल्पना वापरली आहे. शेतकऱ्याने चक्क शॅम्पूचा उपयोग करत पिकांना वाचविले आहे. यामुळे त्यांच्या आयडीयाच्या कल्पनाची सर्वत्रच चर्चा होत असून त्याचे कौतुक होत आहे.

अमरावती जिल्ह्यातील शिरसगाव बंड येथील शेतकरी मनोज निंभोरकर यांनी ही अनोखी कल्पना वापरली यावर मनोज निरंभकर यांनी आपल्या शेतात दोन वर्षांपासून रानडुकरापासून हरभरा बियाण्याचा बचाव करण्याची नवीन शक्कल लढवली. या शेतकऱ्याने पेरणीपूर्वीच आपल्या हरभरा बियाण्यावर अंघोळीला वापरण्यात येणारा शाम्पू लावून ते उन्हात वाळविले. त्यानंतर त्या बियाण्यावर कीड प्रतिबंधक औषधी व रसायने लावून शेतात पेरणी केली.

रानडुकरांनी शेतात शिरून बियाणे खाण्याचा प्रयत्न केला. परंतु, शाम्पूमुळे त्यांच्या तोंडात फेस होत होता. यामुळे कन्फ्युज झालेले रानडुकरे शेत सोडून पळू लागले. हा यशस्वी प्रयोग त्यांनी गतवर्षी सर्वप्रथम केल्याने त्यांचे इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत नगण्य नुकसान झाले. या शेतकऱ्याने एक देशी जुगाड करून आपल्या पिकाचे संरक्षण केले असून त्यामुळे एका अर्थाने उत्पन्नातही भरघोस भर पाडून घेतली आहे.

पत्नीसोबत अनैसर्गिक सेक्स बलात्कार नाही, तिच्या संमतीचीही आवश्यकता नाही; उच्च न्यायालयाचा निर्णय

टी-२० वर्ल्डकपमध्ये 'इॅम्पॅक्ट प्लेयर'चा नियम नाही, दिग्गज खेळाडू म्हणाला, "कर्णधाराची वेगळी रणनीती..."

साताऱ्यात देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले, " उदयनराजेंनी जी कामे हातात घेतली..."

"...म्हणून मी तुमच्याकडे मत मागायला आलोय", साताऱ्याच्या सभेत अजित पवारांनी सांगितलं खरं कारण

IPL 2024 : चेन्नई आणि लखनऊ संघाला मोठा धक्का! स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर, प्ले ऑफचं स्वप्न भंगलं?