राजकारण

वंदे भारतच्या उद्घाटनाचं निमंत्रण नाही, आता दणका दाखवणार; जलील आक्रमक

Published by : Shweta Shigvan-Kavankar

छत्रपती संभाजीनगर : जालन्याहून शनिवारी वंदे भारत रेल्वे धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. परंतु, वंदे भारत रेल्वेच्या उदघाटनाला खासदार इम्तियाज जलील यांना आमंत्रण दिले नाही. यावर जलील यांनी जाहिर नाराजी व्यक्त करत वंदे भारत रेल्वेच्या उद्घाटनाचं निमंत्रण दिलं नाही आता दणका दाखवणार, असा इशाराच सरकारला दिला आहे.

इम्तियाज जलील म्हणाले की, औरंगाबादचा खासदार असताना रेल्वे आणि हवाई संपर्कासाठी मी लोकसभेत सर्वाधिक प्रश्न उपस्थित केले होते. आता हे घडत असताना निमंत्रण यादीत माझे नाव टाकायला ते सोयीस्करपणे विसरतात. मला त्याची फारशी पर्वा नसली तरी विकासाच्या मुद्द्यावरही हे गलिच्छ राजकारण का, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

जालन्यातून गाडी सुरू होते पण त्यांनी परभणीच्या खासदाराचे नाव जोडले तर औरंगाबादच्या खासदाराचे नाव का नाही? घाणेरडे राजकारण करता येत असेल तर उद्या मीही गलिच्छ खेळ खेळेन तयार करा, असा इशाराच त्यांनी दिला आहे.

दरम्यान, आत्मनिर्भर भारत अंतर्गत वंदे भारत ट्रेन बनवण्यात आली असून पंतप्रधान मोदी हिरवा झेंडा दाखवला आहेत. ही ट्रेन जालन्याहून सात तासाच्या आत मुंबईला पोहचणार आहे. वंदे भारतमुळे मराठवाड्यातील पर्यटनाला चालना मिळणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...