राजकारण

...म्हणूनच राष्ट्रपती मुर्मूंच्या हस्ते संसदेचे उदघाटन नाही; आंबेडकरांचा दावा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

पुणे : संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनावरुन राजकारण आता चिघळले आहे. या उद्घाटनाला भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण दिले नसल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावरुन विरोधकांकडून मोदी सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. तर, विरोधकांनी उदघाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे. यामध्ये आता वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही उडी घेतली असून भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.

भाजप आणि आरएसएस वैदिक धर्माला मानणारी आहे. या धर्मात महिला आणि आदिवासी यांना कुठलेही स्थान नाही. आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू एक आदिवासी महिला आहे. त्याचमुळे त्यांच्या हस्ते याचे उद्घाटन केलं जात नाही, ही फार दुर्दैवी बाब आहे, अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले आहे.

याआधीही प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर निशाणा साधला होता. मोदी प्रचंड प्रसिद्धीसाठी हावरट आणि हपापलेले आहेत. उद्घाटनाच्या दगडावर फक्त माझंच नाव हवं असा त्यांचा हेतू असतो. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची सत्ता गेली आणि आम्ही सत्तेत आलो तर संसद भवनाचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुन्हा उद्घाटन करू. पंतप्रधान मोदी यांच्या नावाची संसद भवनावरील नेम प्लेटही काढून टाकू, असे आंबेडकर म्हणाले होते.

Daily Horoscope 07 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचं नशीब सोन्यासारखं चमकणार; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 07 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

ICSE 2024 Results: आयसीएसई बोर्डाचा १०वी, १२वीचा निकाल जाहीर; यंदा मुलींनी मारली बाजी!

Rohit Pawar: रोहित पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल; सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाले...

Rice Water: चमकदार त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचे फायदे जाणून घ्या...