राजकारण

आदित्य ठाकरे नासमझ आहेत; विखेंचा निशाणा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अहमदनगर : वेदांता प्रकल्पावरुन राजकारण ढवळून निघत आहेत. यावरुन सत्ताधारी-विरोधक समोरा समोर आले असून एकमेकांवर जोरदार हल्ले करत आहेत. अशातच शिवसेना नेते आदित्य ठाकरे नासमझ आहेत, राज्याबाहेर उद्योग जाण्यास तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच जबाबदार असल्याची टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने सेवा पंधरवड्याचा शुभारंभ नगर इथे विखे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही टीका केली.

वेदांता उद्योग गुजराथमध्ये गेल्याने टीका करणारे शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी नाणार रिफायनरी प्रकल्प दुसऱ्या राज्यात का गेला याची माहिती घ्यावी तसेच वेदांता बाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी याबद्दल माध्यमांना अवगत केले आहे, असे सांगत आदित्य ठाकरे नवीन आणि नासमझ आहेत. त्यांनी आघाडी सरकारच्या काळात राज्यातील नाणार सारखे उद्योग त्यांच्याच नेत्यांमुळे गेलेत हे माहिती करून घ्यावे. हा प्रकार म्हणजे उगाच चोराच्या उलट्या बोंबा मारून पोरकटपणा करण्यासारखे असल्याची टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीहीआदित्यला काय कळतं. तो जी काय मागणी करत होता कंपनीकडे ती आता काहीच दिवसात बाहेर येईल. तुमचा काळ संपला. भविष्यात मंत्री मुख्यमंत्री यासारखी संधी तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही ट्विट करत राहा, पण ते कोणी वाचणार नाही, असा टोला लगावला.

Anil Desai: अर्ज भरण्यापूर्वी अनिल देसाईंची प्रतिक्रिया, म्हणाले...

Devendra Fadnavis : माझा उद्धवजींना सवाल आहे, तुम्ही केलेलं एक विकासाचं काम दाखवा

Rohit Pawar : देवेंद्र फडणवीस साहेब खोटं बोलण्याची स्पर्धा लावली तर त्यात तुम्हाला नक्कीच सुवर्णपदक मिळेल

उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रत्युत्तर, म्हणाले...

उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...