Rahul Gandhi
Rahul Gandhi Team Lokshahi
राजकारण

अग्निवीर योजना आरएसएसची कल्पना, अजित डोवालांनी लष्करावर लादली; राहुल गांधींचे घणाघात

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी लोकसभेत आभार प्रस्तावावर चर्चा झाली. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या भारत जोडो यात्रेचा उल्लेख करत महागाई, बेरोजगारी, अग्निवीर योजना, गरिबी आणि अदानी या मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. अग्निवीर योजना ही योजना अजित डोवाल यांनी लष्करावर लादली आहे. ही आरएसएसची कल्पना आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

यात्रेदरम्यान जनतेशी बोलण्याची आणि त्यांच्या समस्या ऐकण्याची संधी मिळाल्याचे राहुल गांधी म्हणाले. ते म्हणाले की, आता तुम्ही अग्निवीर योजनेचे कौतुक केले, पण लष्कर भरतीसाठी पहाटे चार वाजता रस्त्यावर धावणाऱ्या बेरोजगार तरुणांना हे मान्य नाही. चार वर्षांनंतर आम्हाला सैन्यातून हाकलून दिले जाईल, असे या लोकांचे म्हणणे आहे.

राहुल गांधी म्हणाले, लष्करातील निवृत्त अधिकारी म्हणत आहेत की अग्निवीर योजना लष्कराची नाही. ही योजना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आली आहे. गृह मंत्रालयाकडून आले आहे. तो लष्करावर लादण्यात आला आहे. अजित डोवाल यांनी लादले आहे. समाजात बेरोजगारी आहे, अग्निवीरानंतर समाजात हिंसाचार वाढेल. अजित डोवाल यांचे नाव घेतल्यावर सत्ताधारी पक्षाकडून आक्षेप घेण्यात आला आणि तुम्ही त्यांचे नाव घेऊ शकत नाही, असे सांगण्यात आले. ते का घेऊ शकत नाही, असे राहुल गांधी आणि काँग्रेसचे सदस्यांनी विचारले.

"उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्रिपद हिरावून घेतलं, म्हणून..." कणकवलीत नारायण राणेंच्या सभेत 'राज'गर्जना

पत्नीसोबत अनैसर्गिक सेक्स बलात्कार नाही, तिच्या संमतीचीही आवश्यकता नाही; उच्च न्यायालयाचा निर्णय

टी-२० वर्ल्डकपमध्ये 'इॅम्पॅक्ट प्लेयर'चा नियम नाही, दिग्गज खेळाडू म्हणाला, "कर्णधाराची वेगळी रणनीती..."

साताऱ्यात देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले, " उदयनराजेंनी जी कामे हातात घेतली..."

"...म्हणून मी तुमच्याकडे मत मागायला आलोय", साताऱ्याच्या सभेत अजित पवारांनी सांगितलं खरं कारण