राजकारण

पंतप्रधान मोदी संसदेच्या उदघाटनाला राज्याभिषेक समजताहेत; राहुल गांधींचा निशाणा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींनी आज नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले. अनेक विरोधी पक्षांनी या उद्घाटन कार्यक्रमाला विरोध करत या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. तामिळनाडूच्या अध्यानम संतांनी संपूर्ण विधीपूर्वक विधी पार पाडला. पंतप्रधान मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला पूजेला बसले होते. धार्मिक विधीनंतर अधिनस्थ संतांनी सेंगोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केले, जे नवीन संसद भवनात स्थापित करण्यात आले आहे. यावर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीकास्त्र सोडले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनात ऐतिहासिक सेंगोलची स्थापना केली आहे. तामिळनाडूतून आलेल्या संतांच्या नामजपानंतर पंतप्रधान मोदींनी लोकसभेत सभापतींच्या खुर्चीजवळ सेंगोल स्थापित केले. यानंतर त्यांनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले. यावर राहुल गांधींनी ट्विटरद्वारे निशाणा साधला आहे. संसद हा लोकांचा आवाज आहे. पंतप्रधान मोदी संसदेच्या उदघाटनाला राज्याभिषेक समजत आहेत, अशी जोरदार टीका राहुल गांधींनी केली आहे.

दरम्यान, काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे. राज्याच्या प्रमुख असल्याने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नव्या संसद भवनाचे उद्घाटन करावे, असे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. उद्घाटन सोहळ्यापूर्वी पंतप्रधान मोदी नवीन संसद भवन प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल, असे म्हंटले आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा; कांद्यावरील निर्यातबंदी हटवली

नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात; राज ठाकरेंची आज कणकवलीत सभा

Daily Horoscope 4 May 2024 Rashi Bhavishya: 'या' राशींच्या लोकांचे वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस ; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 4 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

'आमचं सरकार आलं तर 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवू' राहुल गांधींची मोठी घोषणा