राजकारण

सरकारचं आता अति होतंय; आव्हाडांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर रोहित पवार संतापले

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकारण आता चांगलेच तापले आहे. राजकीय वर्तुळातूनही शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठविण्यात येत आहे. यावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

कळवा येथे एका पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी धक्का दिल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. भाजप महिला पदाधिकाऱ्यानी हा आरोप केला असून आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर रोहित पवार यांनी ट्विटरवरुन टीकास्त्र सोडले आहे.

ते म्हणाले की, सरकारचं आता अति होतंय! एकदा प्रयत्न करून बघितला. पण, सत्याचा आवाज दाबता येत नाही म्हणून दुसऱ्या गुन्ह्यात गोवणं हा रडीचा डाव आहे! तक्रारदाराची राजकीय पार्श्वभूमी आणि तो व्हिडिओ बघितला तर कोणतीही महिला भगिनी सांगेन की, सत्य काय आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्यावर मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुंब्रा पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांनी रास्ता रोको, रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. तर, ठाण्यातही काही ठिकाणी रस्त्यावर जळालेले टायर टाकून वाहतूक कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. यावेळी कार्यकर्त्यांकडून शिंदे-फडणवीस सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे.

"हे मोदी सरकार नव्हे, हे तर गजनी सरकार"; उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर डागली 'मशाल'

"कुणी भारताला थप्पड मारली, तर त्याचा जबडा तोडण्याची हिंम्मत आजच्या भारताकडे आहे", सोलापूरात योगी आदित्यनाथ कडाडले

"देशातील वाढत्या महागाईला नरेंद्र मोदीच जबाबदार", मविआच्या सभेत शरद पवारांचा महायुतीवर घणाघात

"नरेंद्र मोदींचं काम पाहून राज ठाकरेंनी..."; शिवतीर्थावर ठाकरेंची भेट घेतल्यानंतर श्रीकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

"...तर सर्वसाधारण कार्यकर्तासुद्धा खासदार बनू शकतो"; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेश म्हस्केंचं मोठं विधान