Shambhuraj Desai vs Uddhav Thackeray
Shambhuraj Desai vs Uddhav Thackeray 
राजकारण

जीभ हासडण्याची भाषा कराल तर... शंभुराज देसाई यांचा उद्धव ठाकरेंना इशारा

Published by : Pankaj Prabhakar Rane

प्रशांत जगताप : सातारा | शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिंदे गट व ठाकरे गट निर्माण झाला आहे. यामुळे या दोन्ही गटातील नेते मंडळी एकमेकांवर शाब्दिक टीका करत आहे. यातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या एका वक्तव्यावर शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई चांगलेच आक्रमक झाले आहे. जीभ हासडण्याची भाषा कराल तर जशास तसे उत्तर देऊ असा स्पष्ट इशारा शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यावेळी बोलताना देसाई म्हणाले, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच शिमगा सभेचं भाषण हे दर्जा घसरलेलं होतं. तसंच खालच्या स्थराला जावुन त्यांनी हे भाषण केलं. महाराष्ट्रातल्या सामान्य शिवसैनिकांची घोर निराशा यामुळं झाली असल्याचे देखील देसाई म्हंटले आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबत उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टिकेचं आम्ही निषेध करतो असं‌ शंभुराज देसाई म्हणाले. उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त पुढचं आम्हाला बोलता येतं. आमच्या नेत्यांनी संयम सोडायचा नाही असं आम्हाला सांगितल आहे, त्यामुळे आम्ही गप्प आहोत.

ज्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा वारसा सांगता त्यांचे तुम्ही चिरंजीव असून तुम्हाला ही भाषा शोभत नाही. पुन्हा जर जीभ हासडण्याची भाषा कराल तर याला जशास तसं उत्तर दिल जाईल असा इशारा मंत्री शंभुराज देसाई यांनी दिला आहे.

दरम्यान नुकतेच रत्नागिरीमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी ठाकरे यांनी भाजपसह शिंदे गटावर जोरदार हल्ला केला होता. यावेळी बंडखोर, गद्दार अशा शब्दात ठाकरे यांनी भर सभेत एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील आमदारांना खडेबोल सुनावले होते.

मंधाना-शेफालीचा धमाका! टीम इंडियाची विजयी हॅट्ट्रिक; बांगलादेशचा धुव्वा उडवून T20 मालिका जिंकली

"धेर्यशील माने किंवा इतर उमेदवार महत्त्वाचे नाहीत, कारण...", हातकणंगलेत देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Daily Horoscope 3 May 2024 Rashi Bhavishya: 'या' राशींच्या लोकांचा शुभ काळ होणार सुरु; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष ३ मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

"ज्यांनी गुन्हा केला नाही, त्यांना तुरुंगात टाकण्याचं काम मोदी सरकारनं केलं", सांगलीच्या सभेत शरद पवारांचा हल्लाबोल