devendra fadnavis | BMC
devendra fadnavis | BMC  Team Lokshahi
राजकारण

मुंबई महापालिकेच्या घोटाळ्यांची चौकशी करणार, अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या...

Published by : Shubham Tate

अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभं आहे. आपण सर्वजण मिळून त्यांना मदत करु, अस आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत व्यक्त केलं. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नियम 260 अन्वये राज्यातील कृषी क्षेत्र आणि पूरपरिस्थिती यासंदर्भात मांडलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना फडणवीस बोलत होते. 22 ऑगस्टपर्यंत राज्यामध्ये सततचा पूर, अतिवृष्टीमुळं 81 लाख 2 हजार हेक्टर जमीन बाधीत झाली आहे. याचा मोठा फटका विदर्भ आणि मराठवाड्याला बसला असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिली आहे. (special cag audit bmc says devendra fadnavis)

तसेच मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर आलेली आहे, त्यामुळे भाजप-शिवसेना यांच्यातील आरोप-प्रत्यारोप शिगेला पोहचताना दिसत आहेत. अशातच देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती दिली आहे. मुंबई महापालिकेत गेल्या दीड वर्षात झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्यात येणार असं मत मांडत त्यांनी विधानसभेत शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे.

दरम्यान, याआधीच भाजप आमदारांनी मुंबई महापालिकेतील घोटाळ्याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. तसेच या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणीही केली होती. त्याची गंभीर दखल घेत फडणवीसांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे महापालिकेत कॅगचे विशेष ऑडिट केले जाणार असल्याचे बोलले जात आहे. या घोटाळ्यात अनेक अधिकारी आणि कर्मचारी असल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्याने या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या जाणार असल्याची चर्चा रंगली आहे.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...