राजकारण

कोणतीही गाव कर्नाटकात जाणार नाहीत, तर उचलून नेणार का : पालकमंत्री

Published by : Shweta Shigvan-Kavankar

संजय देसाई | सांगली : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील कोणतीही गावे कर्नाटक मध्ये जाणार नाहीत, असा विश्वास सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर जर गावे जाणार नसतील, तर काय उचलून नेणार आहे का, असा टोला पालकमंत्री सुरेश खाडे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोईप्पा यांना लगावला आहे.

जत तालुक्यातील कोणतीही गाव कर्नाटकमध्ये जाण्यास तयार नाहीत. सदरचा ग्रामपंचायतीचा ठराव हा 2013-14 मधील आहे. मात्र, आता त्या ग्रामपंचायत विलीन देखील झाल्या आहेत. जो पाण्याचा प्रश्न होता. तो बऱ्यापैकी मिटलेला आहे. सात टक्के भागामध्ये पाणी पोहोचलेला आहे आणि उर्वरित 40 टक्के भागात लवकरच पाणी पोहचेल, असे त्यांनी सांगितले.

आपण दहा वर्ष जत तालुक्याचे आमदार म्हणून काम केलं आहे. त्यामुळे आता देखील या गावातील कोणीही कर्नाटकमध्ये जाण्यास तयार नाहीत. तरी देखील या प्रश्नांवर जत तालुक्यात आज तातडीने जाऊन सर्वपक्षीय बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचे सुरेश खाडे यांनी स्पष्ट केले आहे.

काय म्हंटले कर्नाटकचे मुख्यमंत्री?

महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर कर्नाटक दावा सांगण्याचा गांभीर्यानं विचार करत आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा दुष्काळी आहे. तिथे पाण्याची तीव्र टंचाई भासते. यामुळं तेथील 40 ग्रामपंचायतींनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव केला आहे. याच ठरावावर कर्नाटक सरकार विचार करत असल्याचं बोम्मई यांनी सांगितलं. याशिवाय महाराष्ट्रात ज्या ठिकाणी कन्नड शाळा आहेत त्या शाळांचा विकास कर्नाटक सीमा विकास प्राधिकरणामार्फत निधी दिला जाणार आहे.

Daily Horoscope 4 May 2024 Rashi Bhavishya: 'या' राशींच्या लोकांचे वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस ; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 4 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

'आमचं सरकार आलं तर 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवू' राहुल गांधींची मोठी घोषणा

Garlic: उन्हाळ्यात 'या' लोकांनी लसूण खाणे टाळावे

Cold Water: माठातील पाणी फ्रिजसारखं गार कसं करायचं? जाणून घ्या...