राजकारण

सुषमा अंधारे म्हणाल्या, अजित दादा पवार हे मुख्यमंत्री होणार असल्यामुळेच...

Published by : Siddhi Naringrekar

अजित पवार यांनी शिंदे-फडणवीसांना साथ देत राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवून आणला. उपमुख्यमंत्री पदाची शपथ अजित पवारांनी घेतली. याच पार्श्वभूमीवर शिंदे गट नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अनेक प्रतिक्रिया देखिल येत आहे. यातच अजून खातंवाटप आणि मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही आहे.

याच पार्श्वभूमीवर आता सुषमा अंधारे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या की, राज्यातील मंत्री मंडळाचा विस्तार होण्यासाठी वेळ लागतो आहे. याचे कारण अजित दादा पवार हे मुख्यमंत्री होणार असल्यामुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खाते वाटपाला उशीर होतोय असं विधान सुषमा अंधारे यांनी पुण्यात केला आहे.

तसेच त्या पुढे म्हणाल्या की, समृद्धी महामार्गावर अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांवर सामूहिक अंत्यसंस्कार सुरू असताना राज्यातील भाजपाचे मंत्री आणि त्यांचे सहयोगी सदस्य शपथविधी घेत होते हे राज्यातील कलंकित सरकार आहे.

"मोदींनी काँग्रेसचा कलंक संपवून अयोध्येत राम मंदिर उभारलं"; उत्तर प्रदेशचे CM योगी आदित्यनाथ यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Manoj Jarange Patil : 4 तारखेला उपोषण करणार म्हणजे करणार

स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण; अरविंद केजरीवाल यांच्या पीएला अटक

संजय राऊत यांच्यावर अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रोहित पवार यांनी ट्विट करत परळी तालुक्यात बोगस मतदान झाल्याचा केला आरोप; म्हणाले...