India Vs Ireland
India Vs Ireland Team Lokshahi
राजकारण

T20 WOrld Cup Woman: भारताचा आयर्लंडवर 5 धावांंनी विजय; विजयासह थेट उपांत्य फेरीत धडक

Published by : Sagar Pradhan

महिला टी -20 वर्ल्डकपमध्ये आज भारताचा सामना आयर्लंडसोबत झाला. या सामन्यात भारतीय संघाने आयर्लंडवर 5 धावांंनी विजय मिळवला आहे. चालू सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला विजयी घोषित करण्यात आलं आहे. या विजयासोबतच भारतीय महिला संघाने T20 विश्वचषक उपांत्य फेरीत प्रवेश केला. आता उपांत्य फेरीत भारताचा सामना गतविजेत्या ऑस्ट्रेलिया संघासोबत होणार आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकांत 6 गडी गमावून 155 धावा केल्या. त्यात स्मृती मानधना आपल्या शतकापासून हुकली. 56 चेंडूंत नऊ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 87 धावा करून ती बाद झाली. आंतरराष्ट्रीय टी-20 मधील ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. प्रत्युत्तरादाखल खेळताना पावसामुळे खेळ थांबेपर्यंत आयर्लंडच्या संघाने 8.2 षटकांत दोन गडी गमावून 54 धावा केल्या होत्या. मात्र, पावसामुळे खेळ थांबवण्यात आला तेव्हा डकवर्थ लुईस पद्धतीनुसार भारत पाच धावांनी पुढे होता. म्हणजेच आयर्लंडला हा सामना जिंकायचा असेल तर 8.2 षटकात 59 धावा करायच्या होत्या. डकवर्थ लुईस पद्धतीने आयर्लंड पाच धावांनी मागे होता आणि हे निर्णायक घटक ठरले. त्यानंतर भारताला डकवर्थ लुईस नियमानुसार विजयी घोषित केले.

IPL मध्ये जॅक्सने दाखवली 'विल'पॉवर! ख्रिस गेलचा दहा वर्षांपूर्वीचा 'हा' विक्रम मोडला

Rahul Shewale: 'कॉंग्रेसच्या विचारांचा पराभव करायचायं' अर्ज दाखल करण्यापूर्वी शेवाळेंची प्रतिक्रिया

Harbour Local: हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत; CSMT जवळ लोकलचा डबा घसरला

सोलापूरमध्ये PM नरेंद्र मोदींचं 'इंडिया'आघडीवर शरसंधान, म्हणाले; "देशाला भ्रष्टाचार, दहशतवादात..."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पुण्यात सभा; मुरलीधर मोहोळ म्हणाले...