Uddhav Thackeray | Shiv Sena
Uddhav Thackeray | Shiv Sena team lokshahi
राजकारण

भाजपची कितीही कुळं आली तरी शिवसेना नष्ट करू शकणार नाहीत; उद्धव ठाकरे आक्रमक

Published by : Shubham Tate

Uddhav Thackeray : आज शिवसेनेच्या मार्मिकचा 62 वा वर्धापण दिन साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर बोचरी टीका केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, व्यंगचित्रकार बदलले खाळ बदलला पण परिस्थिती तशीच आहे. तसेच तिरंगा आहे पण जनतेकडे घरचं नाही त्यांनी तिरंगा कुठे फडकवायचा असा सवाल उपस्थित होत आहे. राज्यात सत्तेत आलेल्या आणि केद्रातील सरकारवर देखील यावेळी ठाकरेंनी सडकून टीका केली. (Uddhav Thackeray criticizes BJP)

यावेळी बोलताना ते म्हणाले की, शिवसेना नसती तर मुंबई आणि देशातील हिंदूंच काय झालं असतं. त्यामुळे भाजपची कितीही कुळं आली तरी शिवसेना कोणीही नष्ट करू शकणार नाही. तसेच भाजपला संघ राज्य पद्धत संपवायची आहे का? असा देखील सवाल यावेळी ठाकरेंनी केला. तसेच मार्मिक आणि शिवसेनेकडे कायम तरुणांच आकर्षण असल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला.

पुढे बोलताना ते म्हणाले की, भारतमाता आपलीच मालमत्ता असल्याच काहींना वाटत आहे. केवळ तिरंगा फडकावून राष्ट्रभक्त होता येत नाही. राज्यात सध्या पूरग्रस्त भागात जायला खाती नाहीत, मंत्रीपद मिळालं पण खातीच नाहीत. खातेवाटपाच्या दिरंगाईमुळे त्यांनी राज्यातील सरकारवर तोंड सुख घेतलं.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...