लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा तणाव आणखी सुरुच आहे. यातच मविआने प्रकाश आंबेडकरांना 4 जागांचा प्रस्ताव दिला होता मात्र हा प्रस्ताव आंबेडकरांनी फेटाळला आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकरांनी 24 मार्च रोजी माध्यमांशी बोलताना मोठी घोषणा केली आहे. 27 तारखेला अकोल्यातून अर्ज भरणार आणि वंचित पक्षाच्या वतीने लढणार अस जाहीर केले आहे.