ताज्या बातम्या

भाजपाचा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याशी कसलाही संबंध नाही - संजय राऊत

ठाकरे गटाचे संजय राऊत हे बेळगाव दौऱ्यावर आहे.

Published by : Siddhi Naringrekar

ठाकरे गटाचे संजय राऊत हे बेळगाव दौऱ्यावर आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीमधील उमेदवारांच्या प्रचारासाठी संजय राऊत बेळगावला गेले आहेत. यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. राऊत यांनी म्हणाले की, वसंतदादांपासून मुंबईच्या रक्षणासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यांनी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू म्हटले आहे. त्याचा विसर पडू दिला नाही. आम्ही मुंबईला धक्का लागू देणार नाही. बेळगावात येऊन एकीकरण समितीच्या विरोधात प्रचार करणे म्हणजे सीमभागाचा दावा कमी करण्याचा प्रकार आहे. असे राऊत म्हणाले.

यासोबतच ते म्हणाले की, सीमाभागातील लोक दहशतीखाली आहेत. मुंबईवर सातत्याने हल्ले करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. कमजोर करण्याचा प्रयत्न केला जात आहे, प्रकल्प पळवून नेले जात आहेत.मुंबई केंद्रशासित करण्याचा डाव होता.मुंबई ही भांडवलदारांची बटीक करण्याचा प्रयत्न असल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला. भाजपचा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याशी कसलाही संबंध नाही. भाजपच्या यापूर्वीच्या नेत्यांनी सीमाभागात येऊन प्रचार केला नाही. असे राऊत म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raigad : रायगडमध्ये समुद्रात संशयास्पद बोट आढळली; सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

Navi Mumbai : नवी मुंबईतील तुर्भेच्या गोडाऊनला भीषण आग

Latest Marathi News Update live : हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे वाहतूक बंद

Harbour Line : हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे वाहतूक बंद