'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील' या एका लाईनमुळे रातोरात प्रकाशझोतात आलेले शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अवघ्या आठ दिवसात नऊ किलो वजन घटवलं आहे. एवढ्या कमी दिवसात कसं काय त्यांनी वजन कमी केलं. याचे कारण त्यांनी स्वत: सांगितले आहे.
शहाजीबापू पाटील म्हणाले की, वजन कमी करण्यासाठी बंगळुरूला गेलो. तिथं श्री श्री रवीशंकर यांच्या आश्रमात आर्ट ऑफ लिव्हिंगचा 10 दिवसांचा कोर्स केला. सुरुवाती पाच ते सहा दिवस त्यांनी पंचकर्म केलं. तेव्हा वेगवेगळे काढे प्यायला दिले. वेगवेगळ्या तेल आणि पावडरने मालिश केली. या सगळ्याने माझं चार किलो वजन कमी झालं.माझा गुडघा दुखत होता. त्यामुळे डॉक्टरांनी गेल्यावर त्यांनी मला दोन पर्याय दिले एकतर ऑपरेशन करणं किंवा वजन कमी करणं. ऑपरेशन करण्यापेक्षा मी वजन कमी करण्याचा पर्याय निवडला.
पंचकर्म, योगासने आणि डायटच्या माध्यमातून 8 दिवसात 9 किलो वजन कमी केलं. खूप चांगला अनुभव मिळाला आहे, जीवन खूप सुंदर आहे. त्यासाठी फिट राहाणं गरजेचं आहे,मग मेडिटेशन सुरु केलं. मेडिटेशनच्या माध्यमातून सुदर्शन क्रिया केली. त्यांचा वाफेवर उकडलेला आहार घेतला. व्यायाम केला. या सगळ्याचा परिणाम होऊन वजन कमी झालं. असे त्यांनी सांगितले.