ताज्या बातम्या

म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्री पद दिले - सुषमा अंधारे

मुख्यमंत्री पद हे उद्धव ठाकरेंकडे कसे काय गेले हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

मुख्यमंत्री पद हे उद्धव ठाकरेंकडे कसे काय गेले हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या विषयावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, सरकारमधील नेतेच शिवाजी महाराजांचा अवमान करत आहेत. या नेत्यांचा मनसे राजीनामा का मागत नाही? पण मनसे म्हणते की, सुषमा अंधारे यांचा राजीनामा घेतला पाहिजे. अरे माझा राजीनामा घ्यायला मी काय मंत्री आहे का?, महत्त्वाची खाती स्वतःकडे ठेवली आणि कपडे फाडणारी खाती शिंदे गटाकडे दिली. शिंदेंना बदनाम करण्याचे हे फडणवीस यांचे षडयंत्र आहे. फडणवीस हा कपटनितीमध्ये एक नंबर माणूस आहे. असे सुषमा अंधारे म्हणाले.

यासोबतच अजित पवार, अशोक चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम केले नसते म्हणून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केले, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे. आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तरी महत्त्वाची खाती देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहेत. असे सुषमा अंधारे यांनी सांगितले. त्या सोलापूरमधील महाप्रबोधन यात्रेत त्या बोलत होत्या.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा