क्रिकेट

Ind vs Eng: तिसऱ्या वनडे सामन्यात भारताचा 142 धावांनी विजय; ३-0 ने जिंकली मालिका!

भारताने तिसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडला 142 धावांनी पराभूत करत ३-0 ने मालिका जिंकली.

Published by : Prachi Nate

भारताने इंग्लंडला तिसऱ्या वनडे मालिकेत 142 धावांनी पराभूत करत विजयाचा झेंडा रोवला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतासाठी हा मालिका विजय खूप महत्त्वाचा ठरला आहे. भारतीय संघ खूप काळानंतर वनडे सामने खेळण्यासाठी उतरला होता, पण भारताच्या सर्वच खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत आयसीसी स्पर्धेसाठी संघांची तयारी चांगली कशी आहे हे दाखवून दिले.

शुभमन गिलचे 112 शतक, विराट कोहलीचं अर्धशतक करत कमबॅक, श्रेयस अय्यरची 78 धावांसह वादळी खेळी आणि अर्शदीप सिंगसह हर्षित राणा याने चांगली गोलंदाजी केली. भारतीय संघाचे फलंदाज आणि गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारताने तिसऱ्या वनडे सामन्यात दणदणीत विजय नोंदवला आहे. भारतीय संघाने केलेल्या 356 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 214 धावांवर गारद झाला. भारताने या वनडे मालिकेत इंग्लंडवर निर्भेळ मालिका विजय नोंदवला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : थोड्याच वेळात राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

Raj Thackeray - Devendra Fadnavis : राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज