IND vs SA Playing-11
IND vs SA Playing-11 team lokshahi
क्रीडा

IND vs SA Playing-11 : ऋषभ पंत समोर दक्षिण आफ्रिकेला रोखण्याचे आव्हान, उमरान किंवा अर्शदीपला मिळणार संधी

Published by : Shubham Tate

IND vs SA Playing-11 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना शुक्रवारी होणार आहे. या सामन्यात भारताला विजय मिळवणे आवश्यक आहे, कारण सामना हरल्याने ही मालिकाही टीम इंडियाच्या (Team India) हातातून जाणार आहे. मागील सामना जिंकून कर्णधार ऋषभ पंत आणि त्याच्या संघाने मालिकेत पुनरागमन केले असून पुढील सामना जिंकून त्यांना ही खेळी कायम ठेवायची आहे. (ind vs sa 4th t20i series match preview head to head playing 11 prediction today match captain and vice captain)

या विक्रमाबद्दल बोलायचे झाले तर भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांच्या भूमीवर सात सामने खेळले आहेत. यामध्ये दक्षिण आफ्रिकेने पाच सामने जिंकले असून भारताने दोन सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर दोन्ही देशांदरम्यान एकूण 18 सामने खेळले गेले आहेत. भारताने 10 विजयांसह आघाडीवर आहे, तर दक्षिण आफ्रिकेने आठ सामने जिंकले आहेत.

टी-20 सामन्यांमध्ये राजकोटच्या मैदानावर भारताचा वरचष्मा आहे. टीम इंडियाने आतापर्यंत तीन टी-20 सामने खेळले आहेत, ज्यात दोन जिंकले आहेत. तीनही वेळा भारताने येथे दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. फॉर्ममध्ये असलेल्या ऋषभ पंतला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'करा किंवा मरो' चौथ्या टी-20 सामन्यात मधल्या षटकांमध्ये दडपण टाळण्यासाठी चांगली खेळी खेळावी लागणार आहे. विशाखापट्टणममध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने मोठा विजय नोंदवला. पंतच्या बाबतीत खास गोष्ट अशी आहे की, जेव्हा त्याच्यावर कोणत्याही फॉरमॅटमध्ये टीका होते तेव्हा तो शानदार खेळी करतो आणि सर्वांची तोंडे बंद करतो आणि चौथ्या सामन्यात त्याला ही संधी आहे.

ऋतुराज-ईशानकडून पुन्हा चांगल्या सुरुवातीची अपेक्षा

अखेरच्या सामन्यात ऋतुराज गायकवाड आणि इशान किशन यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. इशानने परिपक्व फलंदाजीसह राखीव सलामीवीर म्हणून आपला दावा सिद्ध केला आहे आणि ऑस्ट्रेलियात यंदाच्या T20 विश्वचषकासाठी निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले असावे. गायकवाड आणि ईशानला उर्वरित दोन सामन्यांमध्येही ही गती कायम ठेवायची आहे. त्यानंतर नियमित सलामीवीर परतण्यापूर्वी ते आयर्लंडविरुद्ध दोन सामने खेळतील.

मधल्या फळी मजबूत

शॉर्ट बॉलचा सामना करू न शकणाऱ्या श्रेयस अय्यरला आतापर्यंत कोणतीही चमत्कारिक कामगिरी करता आलेली नाही आणि तिसऱ्या क्रमांकावर त्याच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. अखेरीस हार्दिक पांड्याने 21 चेंडूत नाबाद 31 धावा करत संघाला 180 धावांपर्यंत नेले. आता मधल्या फळीतील फलंदाजांना जबाबदारीने खेळावे लागणार आहे.

अक्षर विकेटच्या शतकापासून एक पाऊल दूर

गेल्या सामन्यात युजवेंद्र चहल आणि अक्षर पटेल या फिरकीपटूंनी मधल्या षटकांमध्ये चांगली कामगिरी केली होती. अक्षरने किफायतशीर गोलंदाजी केली, तर चहल विकेट घेण्यात यशस्वी झाला. अक्षर पटेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक पूर्ण करण्यापासून फक्त एक विकेट दूर आहे.

भुवी बुमराहला हरवू शकतो

भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वरला T20I मध्ये जसप्रीत बुमराहला (67) पराभूत करण्यासाठी आणखी चार विकेट्सची गरज आहे. त्याच्या खात्यात सध्या 63 विकेट जमा आहेत. भुवनेश्वर कुमार सातत्याने चांगली गोलंदाजी करत आहे. आवेश खान किफायतशीर असला तरी त्याला विकेट घेता आली नाही. हर्षल पटेलने आपल्या विविधतेच्या जोरावर चार बळी घेतले.

शिरूर मतदारसंघाच्या ईव्हीएम स्ट्राँगरुममधील सीसीटीव्ही 24 तास बंद

Shambhuraj Desai : 4 तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा चांगल्या मताधिक्याने माननीय नरेश म्हस्के साहेब निवडून येतील

"पहिल्या चार टप्प्यातच आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा सुफडा साफ केला "; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा दावा

मोठी बातमी! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक

World Hypertension Day 2024 : 'जागतिक उच्च रक्तदाब दिवस' कधी आणि का साजरा केला जातो?