India Vs West Indies | Shikhar Dhawan team lokshahi
क्रीडा

India vs West Indies : रोमहर्षक सामन्यात भारताचा विजय

प्रथम फलंदाजी करत भारताने 50 षटकात 308 धावा केल्या. विजयासाठी वेस्ट इंडीजला 50 षटकात 309 धावांचे आव्हान होते. त्या प्रत्युत्तर देतांना वेस्ट इंडीज 50 षटकात 6 गडी गमावून 305 धावाच करु शकले.

Published by : Team Lokshahi

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका शुक्रवार 22 जुलैपासून सुरू झाली. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडीजचा पराभव केला आहे. भारताने 3 धावांनी विजय मिळवला. यामुळे भारताने मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. सामन्यात वेस्ट इंडीजच्या रोमारीयो शेफर्ड आणि अकेल हुसेनच्या धुवाधार खेळी केली. त्यामुळे हा सामना चांगलाच रोमांचक झाला. फक्त 3 धावा कमी पडल्याने वेस्ट इंडीजचा पराभव झाला.

प्रथम फलंदाजी करत भारताने 50 षटकात 308 धावा केल्या. विजयासाठी वेस्ट इंडीजला 50 षटकात 309 धावांचे आव्हान होते. त्या प्रत्युत्तर देतांना वेस्ट इंडीज 50 षटकात 6 गडी गमावून 305 धावाच करु शकले. सामन्यात रोमारीयो शेफर्डच्या धुवांधार खेळी करत सामना रोमांचक केला पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. शेफर्डने 25 चेंडूंत 3 चौकार आणि 2 षटकार ठोकत नाबाद 39 धावा केल्या. त्याच्यासह अकील हुसेननेही नाबाद 33 धावांचे योगदान दिले. वन डेमधील वेस्ट इंडिजचा हा सलग सातवा पराभव आहे.

भारताकडून शिखरचे शतक हुकले

भारताने सामन्याच्या सुरुवातीपासून तुफान फटकेबाजी करत वेस्ट इंडिजसमोर तगडे आव्हान ठेवले. शिखर धवन आणि शुभमन गिल या जोडीने दमदार फलंदाजी करत शतकी भागिदारी केली. शुभमन 64 धावांवर बाद झाला. त्यानंतर शिखर 97 धावांवर बाद झाला. त्यानंतर श्रेयसने 54 धावा केल्या.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

Monorail : मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार; MMRDAने घेतला महत्त्वाचा निर्णय