क्रीडा

India-England ODI Series : पंत, हार्दिक पंडयाच्या दमदार कामगिरीमुळे भारतीय संघाचा विजय

Published by : Siddhi Naringrekar

भारताने तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात यजमान इंग्लंडवर पाच गडी आणि ४७ चेंडू राखून मात केली. भारताने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत २-१ अशी सरशी करत विजय मिळवला आहे. ऋषभ पंतचे दमदार शतक आणि हार्दिक पंडयाच्या अष्टपैलू योगदानाच्या बळावर भारताने हा विजय मिळवला.

जसप्रीत बुमराच्या जागी संघात आलेल्या मोहम्मद सिराजने जॉनी बेअरस्टो आणि जो रूट यांना खातेही न उघडता बाद केले. मग सलामीवीर जेसन रॉय (४१), बेन स्टोक्स (२७) आणि कर्णधार जोस बटलर (६०) यांनी इंग्लंडचा डाव सावरला. तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने दिलेले २६० धावांचे आव्हान भारताने ४२.१ षटकांत पूर्ण केले. भारतीय संघाची ४ बाद ७२ अशी स्थिती होती. मात्र, पंत (११३ चेंडूंत १६ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद १२५ धावा) आणि पंडय़ा (५५ चेंडूंत १० चौकारांसह ७१) यांनी पाचव्या गडय़ासाठी १३३ धावांची निर्णायक भागीदारी रचल्यामुळे भारताला विजय मिळवण्यात यश आले.

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिल्यावर इंग्लंडचा डाव ४५.५ षटकांत २५९ धावांत संपुष्टात आला. सलामीवीर जेसन रॉय (४१), बेन स्टोक्स (२७) आणि कर्णधार जोस बटलर (६०) यांनी इंग्लंडचा डाव सावरला. मात्र, या तिघांनाही पंडय़ाने माघारी धाडले. त्यानंतर मोईन अली (३४), लियाम लिव्हिंगस्टोन (२७) आणि क्रेग ओव्हरटन (३२) यांनी काही काळ खेळपट्टीवर टिकाव धरल्याने इंग्लंडला अडीचशे धावांचा टप्पा ओलांडता आला.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...