IPL Team Lokshahi
क्रीडा

‘मुंबई इंडियन्स’ प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर

Published by : Saurabh Gondhali

मुंबई इंडियन्सचा(Mumbai Indians) संघ प्ले ऑफच्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. 11 मॅच खेळणाऱ्या मुंबई संघाला यंदा केवळ 2 मॅचवर कब्जा मिळवता आला आहे. काल झालेल्या सामन्यात मुंबईने चैन्नईचा 5 विकेट्सने पराभव केला. या सामन्यानंतर रोहित शर्माने ( Rohit Sharma) तिलक वर्मा (Tilak Varma) संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. तर टीम इंडियाच्या माजी दिग्गज क्रिकेटरने19 वर्षीय युवा खेळाडू तिलक लवकरच मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार होणार असल्याचे म्हटले आहे.

सीएसकेवर विजय मिळवल्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने तिलक वर्मा लवकरच टीम इंडियाकडून खेळताना दिसेल. कठीण परिस्थितीत त्याने चांगली कामगिरी केली. इतक शांतपणे खेळण अवघड आहे. तो सर्व फॉरमॅटचा खेळाडू आहे. त्याच्याकडे चांगले प्रदर्शन करण्याची ताकद आहे. माझ्या मते तो योग्य मार्गावर आहे. आमच्या सर्वांचे लक्ष त्याच्या खेळावर आहे. असे मत रोहितने यावेळी व्यक्त केले.

मुंबई इंडियन्स आतापर्यंत पाच वेळा आयपीएलची विजेती टीम राहिली आहे. यंदा त्यांच्या वर प्ले ऑफ मधूनच बाहेर पडण्याची नामुष्की ओढवली. त्यांच्या संघाचा परफॉर्मन्स हा अत्यंत खराब राहिला आहे पुढील वर्षी रोहित शर्मा हा कर्णधार राहणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Saath Nibhana Saathiya Gopi Bahu : 'साथ निभाना साथिया' फेम 'गोपी बहू'ने गुपचुप केले लग्न, जाणून घ्या कोण आहे? जियाचा नवरा

GST Slab : आता अनेक वस्तूंवरील कर दर कमी होणार! GST चे चार पैकी दोन स्लॅब रद्द होणार; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Uttar Pradesh Crime : नोरा फतेहीसारखी फिगर मिळवण्यासाठी पतीने केला पत्नीचा छळ; नेमकं प्रकरण काय?

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test