Ravi Shastri On Gautam Gambhir 
क्रीडा

Ravi Shastri On Gautam Gambhir : रवी शास्त्रींचा गौतम गंभीरला इशारा; “निकाल सुधारले नाहीत तर मुख्य प्रशिक्षक बदलू शकतो”

Indian Cricket: रवी शास्त्री यांनी गौतम गंभीरला इशारा दिला आहे की, भारताच्या कसोटी कामगिरी सुधारली नाही तर मुख्य प्रशिक्षक बदलला जाऊ शकतो.

Published by : Dhanshree Shintre

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

भारताच्या कसोटी क्रिकेटमधील अलीकडच्या खराब कामगिरीनंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर जोरदार टीका होत असताना माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर मालिका गमवल्यानंतर गंभीरवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने 18 पैकी 10 कसोटी सामने गमावल्याने नाराजी वाढली आहे. या सर्वावर शास्त्री यांनी एका पॉडकास्टमध्ये बोलताना एकाच व्यक्तीला जबाबदार धरणे चुकीचे असल्याचे सांगत, खेळाडूंनाही जबाबदारी घ्यावी लागेल, असा मुद्दा मांडला.

शास्त्री म्हणाले की, पराभव झाला की प्रशिक्षकावर बोट ठेवणे सोपे असते, पण संघातील खेळाडूंनीही स्वतःच्या चुका स्वीकारल्या पाहिजेत. त्यांच्यात असे भाव असायला हवेत की आपण पराभूत झालो आहोत आणि पुढच्या सामन्यात त्यातून सुधारणा करायची आहे. त्यांच्या मते, जबाबदारी केवळ एका व्यक्तीवर टाकून काहीही बदलणार नाही. या दरम्यान त्यांनी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा उल्लेख करत म्हटले की, हे दोघे एकदिवसीय क्रिकेटमधील मोठी नावे आहेत आणि त्यांच्याशी पंगा घेणे योग्य नाही.

याच संभाषणात रवी शास्त्री यांनी गंभीरला अप्रत्यक्षरीत्या इशारा देत सांगितले की, जर निकाल संघाच्या बाजूने आले नाहीत तर मुख्य प्रशिक्षकाला पदावरून दूर करण्याची वेळ येऊ शकते. खराब कामगिरी कायम राहिली तर कोणालाही हटवले जाऊ शकते आणि त्यामुळे संयम व योग्य व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे ठरते. संघाशी सतत संवाद ठेवणे आणि खेळाडूंना प्रेरित ठेवणे हे प्रशिक्षकाचे मुख्य काम असल्याचेही त्यांनी सांगितले.

गंभीरविरोधात वाढत असलेल्या नाराजीच्या वातावरणात शास्त्रींचे हे वक्तव्य विशेष चर्चेत आले आहे. भारताने मागील काही मालिकांमध्ये निराशाजनक कामगिरी केली असल्याने प्रशिक्षक बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये टीम इंडिया कशी प्रतिक्रिया देते आणि गंभीर या दबावातून संघाला कसा सावरतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • रवी शास्त्री यांनी गौतम गंभीरला भविष्याबाबत इशारा दिला.

  • भारताच्या कसोटी मालिकांतील पराभवामुळे प्रशिक्षक बदलण्याची शक्यता चर्चेत.

  • शास्त्री म्हणाले, खेळाडूंनी स्वतःच्या चुका स्वीकारणे आवश्यक आहे.

  • संयम, संवाद आणि खेळाडू प्रेरणा राखणे प्रशिक्षकाचे मुख्य कार्य ठरते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा