T20 World Cup
T20 World Cup Team Lokshahi
क्रीडा

T20 World Cup : पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिकेच्या विजयानंतर भारतीय संघाचे टेन्शन वाढणार का?

Published by : shamal ghanekar

टी-20 विश्वचषकाच्या सेमीफायनलची रेस ही अधिक रोमांचक झाली आहे. काल झालेल्या सामन्यामध्ये पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा 33 धावांनी पराभव केला. आता पाकिस्तान हा सामना जिंकून गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहचली आहे. त्यामुळे आता टीम इंडियाचं टेन्शन वाढणार आहे. कारण नेदरलँड आणि झिम्बाब्वे संघाने एक-एक सामना जिंकला तर अजूनही पाकिस्तान संघाचा सेमी फायनलमध्ये समावेश होऊ शकतो.

6 नोव्हेंबरला भारत विरूद्ध झिम्बाब्वे हा सामना होणार आहे. भारताला सेमी फायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर झिम्बाब्वेविरुद्धचा अखेरचा सामना भारताला जिंकणे आवश्यक आहे. हा सामना भारताने जिंकला तर भारत पहिल्या स्थानावर राहणार आहे.

पण, भारताचा झिम्बाब्वे संघाने पराभव केला तर भारताला सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी बांगलादेश संघाने पाकिस्तानला हरवणे गरजेचे आहे किंवा नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिका संघाचा पराभव केला पाहिजे. तरच भारत संघ सेमी फायनलमध्ये पोहचू शकतो.

टी-20 विश्वचषकामधील ग्रुप 2 मधील प्रत्येक संघाचे 4 सामने झाले आहेत. तर प्रत्येक संघाचा एक-एक सामना बाकी आहे. टी-20 विश्वचषकाच्या सेमीफायनलची रेसमधून नेदरलँड आणि झिम्बाब्वे बाहेर गेले आहेत. मात्र ग्रुप 2 मधील भारत, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि बांगलादेश अजूनही सेमी फायनलच्या रेसमध्ये स्थान मिळवू शकतात. त्यामुळे टी-20 विश्वचषकाच्या सेमीफायनलची रेस ही अधिक रोमांचक झाल्याचे दिसत आहे.

Navi Mumbai : नवी मुंबईत अनधिकृत होर्डिंगवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई

Monsoon News : केरळमध्ये 31 मे ला मान्सून दाखल होणार,हवामान विभागाचा अंदाज

Amit Shah On Kejriwal : 'केजरीवालांना जामिनाबाबत विशेष वागणूक' अमित शाहांचा मोठा दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोवर संजय राऊत यांची टीका; म्हणाले...

नाशिकमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या सभेत घोषणाबाजी; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...