व्हिडिओ

Nitin Gadkari | राजकारण म्हणजे असंतुष्ट आत्म्यांचा सागर : नितीन गडकरी | Lokshai News

नितीन गडकरी म्हणाले, 'राजकारण म्हणजे असंतुष्ट आत्म्यांचा सागर' - नागपूरमधील पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात त्यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.

Published by : shweta walge

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी राजकारण म्हणजे असंतुष्ट आत्म्यांचा सागर असल्याचे म्हटले आहे. नागपूरमध्ये एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य केल. ते म्हणाले की, राजकारण हा असंतुष्ट आत्म्यांचा समुद्र आहे, जिथे प्रत्येकजण दु:खी आहे. नगरसेवक आमदारकीची संधी न मिळाल्याने दु:खी असतो. मंत्रीपद न मिळाल्याने आमदार नाराज असतो. एखादा मंत्री मुख्यमंत्री होऊ शकला नाही म्हणून दुखी असतो तर, मुख्यमंत्र्याला हायकमांड कधीही पद सोडण्याला सांगेल याची भीती असते, अस ते म्हणाले. गडकरींच्या या वक्तव्यानं अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Aajcha Suvichar : आजचा सुविचार

Mumbai Water Supply : मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली, विंधन विहीर खोदकामाला परवानगी

OBC : ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात भरत कराड यांचा प्राणत्याग; कुटुंबाला आर्थिक मदतीची मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Weather News : गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका; राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा, 'या' जिल्ह्यांना अलर्ट