पुणे: रविकांत तुपकर यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ही कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यावर शिस्तपालन समितीची बैठक पुण्यात पार पडली. या बैठकीला तुपकर उपस्थित राहिले नाही. त्यामुळे समितीने त्यांना अल्टीमेटम दिला होता. 15 ऑगस्टपर्यंत तुपकर यांनी समितीसमोर त्यांची बाजू मांडावी, असा निर्णय पुण्यामध्ये झालेल्या स्वाभिमानी संघटनेच्या शिस्तपालन समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. तरी देखील ते गैरहजर राहिल्याने ही कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, वेगवेगळे पक्ष आणि संघटना फोडणे हा भाजपाचा अधिकृत कार्यक्रम असल्याची टीका स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी केली होती.