राज्यातील सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर मागील ऑक्टोबर पासून विविध आंदोलन करीत आहे. या बाबत त्यांची सरकार सोबत चर्चा देखील झाली परंतु शेतकऱ्यांच्या पदरात निराशाच आली. 13 जानेवारीच्या रात्री मिसाळवाडी ता.चिखली जि. बुलढाणा येथे तुपकरांची जाहीर सभा संपन्न झाली. त्यात त्यांनी सरकारला 18 जानेवरीपर्यंत सोयाबीन-कापसाला भाव देण्याची मागणी करत जर सरकारने 4 दिवसात योग्य निर्णय घेतला नाही तर 19 जानेवारीला सकाळी 6 वाजता बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर स्टेशनवर दिल्ली आणि गुजरातला जाणाऱ्या रेल्वे गाड्या रोखण्याचा इशारा दिलं आहे.