मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दोघांचे दिल्लीला सांभाळण्यात दिवस जाताहेत : जयंत पाटील

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दोघांचे दिल्लीला सांभाळण्यात दिवस जाताहेत : जयंत पाटील

शिंदे-फडणवीस सरकारवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना जोरदार टीका केली.
Published on

मुंबई : मराठवाड्यातील शेतकऱ्यांची झालेली हानी आणि पुणे शहराची प्रचंड वाताहात लक्षात घेता सरकारने जनतेच्या मदतीला जायला पाहिजे होते. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांचे दिल्लीला सांभाळण्यात दिवस जात असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली. तसेच, शिंदे गटातील काही आमदार पश्चाताप करत असून काही आमदार पुनर्विचार करायला लागले आहेत, असेही त्यांनी म्हंटले आहे.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दोघांचे दिल्लीला सांभाळण्यात दिवस जाताहेत : जयंत पाटील
गुवाहाटीमध्ये जाऊन बच्चू कडूंनी कोटींचा व्यवहार केला; रवी राणांचा आरोप

सरकारने शिधा वाटपाची घोषणा उत्साहात केली. सरकार आपली प्रतिमा सुधारण्याच्या गडबडीत आहे. त्यातून घोषणा केली. मात्र, पैशांची जुळणी झालेली नाही, असा आरोप करतानाच जुळणी झाली तर किमान दिवाळीच्या अगोदर घोषणा केल्याप्रमाणे वागावे, अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली. मात्र, सरकारने दिवाळी गोड करणार अशी घोषणा करुन पैशांची तजवीज केली नाही यातून सरकारची अकार्यक्षमता लक्षात येते, असा हल्लाबोलही जयंत पाटील यांनी केला आहे.

उध्दव ठाकरे यांना नामोहरम करणे आणि त्यांना अडचणीत आणणे असा उद्योग काही लोक करत आहेत. मात्र, त्यांना घाबरवण्याचा कितीही उद्देश असला तरी उध्दव ठाकरे दबावाला बळी पडू शकत नाहीत, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याची याचिकेवर दिली आहे.

पहिल्या दिवसापासून या सरकारमध्ये काहीच आलबेल नाहीय. जे लोक शिवसेनेतून फुटून गेले त्यांनी काहीना काही उद्देश व लाभ ठरवून केले आहे हे जनतेच्या लक्षात आले आहे. काही आमदार पश्चाताप करत असून काही आमदार पुनर्विचार करायला लागले आहेत. त्यामुळे पुढच्या काळात चित्र वेगळे असेल, असे भाकीत जयंत पाटील यांनी वर्तविले आहे.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दोघांचे दिल्लीला सांभाळण्यात दिवस जाताहेत : जयंत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेसचे 'डी' गॅंग कनेक्शन उघड, राज्याचे राजकारण तापणार

पाऊस पडणे हे कुणाच्याच हातात नाही पण पडलेल्या पावसाचे पाणी ताबडतोब घालविण्यासाठी जी यंत्रणा पाहिजे होती. त्यात पुणे महानगरपालिका कमी पडली, असा थेट आरोप जयंत पाटील यांनी यावेळी केला. पुणे महानगरपालिकेच्या सुविधा, व्यवस्था, नदीपात्रातून जाणारा पाण्याचा वेग या सर्व गोष्टींमध्ये सुधारणा मागच्या पाच वर्षात करता आली असती. परंतु, ती केली नसल्याने पुण्यातील जनतेवर संकट ओढावले, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

पाऊस पडण्याचे नियंत्रणापालिकेकडे नाही हे सर्वांनाच माहीत आहे. परंतु, संकट पुणे शहरावर आले गाडया वाहून गेल्या. जर नालेसफाई व इतर गोष्टींकडे लक्ष दिले असते. स्मार्ट सिटी कार्यक्रम राबवला त्यातून कामे केली असती तर चांगलं चित्र दिसले असते. पण, वेगळा अनुभव आला, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. पुणे महानगरपालिकेत मागील पाच वर्षात 'अर्थाचा अनर्थ' झाला किंवा काहीच काम झाले नाही. उलट नव्या अतिक्रमणाने, नव्या अडथळयाने पाणी वाहून जाण्याचे प्रमाण स्लो झाले म्हणून हे संकट आले, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दोघांचे दिल्लीला सांभाळण्यात दिवस जाताहेत : जयंत पाटील
'शिंदे सरकार म्हणजे घोषणा सरकार, फक्त बसेसवर स्वतःचे फोटो लावण्यात व्यस्त'

पुणे महानगरपालिकेत आलेल्या संकटाची 'शास्त्रीय चौकशी' करणे आवश्यक आहे, अशी मागणी करतानाच असा पाऊस आला की, पूर येतो मात्र आपण पहातो व विषय सोडून देतो. परंतु, पुणे हे देशातील मुंबईनंतर दहाव्या क्रमांकाचे शहर आहे. त्यामुळे अशा गुंतवणुकीसाठी योग्य असलेल्या शहरात असे होणे कमीपणाचे आहे. नागरी असुविधा होत असतील तर लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असेही जयंत पाटील यांनी म्हंटले आहे.

पुण्यात प्रलय आल्याने शहराची वाताहात झाली. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या जनजीवनावर परिणाम झाला. तर दुसरीकडे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पिकांची प्रचंड हानी झाली आहे. मात्र, मुख्यमंत्री इतर गोष्टीत अडकलेले आहेत, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. मराठवाड्यातील सहा जिल्हयात पावसाने अतिशय गंभीर परिस्थिती केली आहे. शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने बळीराजाच्या पाठीशी तातडीने उभे राहून त्यांची दिवाळी समाधानाने जाईल याची व्यवस्था करावी, अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com