farmers suicide | Farmers Loan  team lokshahi
महाराष्ट्र

महाराष्ट्रात मागच्या 23 दिवसांत 89 शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या

आत्महत्या केलेल्यात बहुतांश शेतकरी औरंगाबाद, बीड आणि यवतमाळ येथील

Published by : Shubham Tate

farmers commit suicide : गेल्या २३ दिवसांत ८९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये बीडमधील 13, यवतमाळमधील 12, परभणी 6, जळगाव 6, जालना 5, बुलडाणा 5, उस्मानाबाद 5, अमरावती 4, वाशिम 4, अकोला 3, नांदेड 2, भंडारा-चंद्रपूर 2 आणि औरंगाबादमधील 22 जणांचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या आत्महत्येमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरचे आव्हान वाढले आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता राज्यात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, अशी घोषणा केली होती. (89 farmers commit suicide in 23 days in maharashtra)

सरकार स्थापन होऊन २४ दिवस उलटले तरी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकलेला नाही. शेतकऱ्यांची काळजी असलेले कृषी मंत्रालय मंत्र्याविना ओस पडले आहे. आत्महत्या केलेल्यात बहुतांश शेतकरी औरंगाबाद, बीड आणि यवतमाळ येथील आहेत.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत मंत्रिमंडळाच्या तीन बैठका घेतल्या आहेत. या बैठकांमध्ये शहरांची नावे बदलणे, सरपंचाची थेट निवडणूक, आरे कारशेड, एमएमआरडीएला कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य सरकारने आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये किसान चेतना अभियान, वसंतराव नाईक कृषी स्वावलंबी मिशनची स्थापना केली आहे. मात्र या दोन्ही योजना मंत्रालयात अडकल्या आहेत.

एक जानेवारी ते जून या सहा महिन्यांत मराठवाड्यात ३०६ तर विदर्भात ३६८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यावेळी एकनाथ शिंदे राज्याचे नगरविकास मंत्री होते आणि शिंदे गटाचे भुसे कृषीमंत्री होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?