महाराष्ट्र

विवाहित प्रेयसीने सोबत येण्यास दिला नकार; प्रियकराने केले चिमुरड्याचे अपहरण

Published by : Shweta Shigvan-Kavankar

भिवंडी : विवाहित प्रेयसी सोबत येत नसल्याच्या रागातून आरोपीने तिच्या अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस स्थानकात तक्रार नोंदविली असता घटनेचे गांभीर्य ओळखत पोलिसांनी मोठ्या शिताफीने अवघ्या 12 तासात आरोपीस ताब्यात घेत अटक केली आहे. रिपोन व्यापारी असे त्या आरोपीचे नाव आहे.

माहितीनुसार, मोहम्मद अली फकीर व त्याची पत्नी आयशा बीबी आपल्या चार वर्षीय आशिक अली या मुलासह टेमघर येथील चाळीत राहतात. 3 एप्रिल रोजी सायंकाळी त्यांचा मुलगा घराबाहेर आढळून आला नाही. तसेच, शोधाशोध करुनही न सापडल्याने आयशा बीबी यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली. पोलिसांनी गांभीर्य ओळखून अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्याच दरम्यान मुलाच्या आईचा पाच वर्षांपासून प्रियकर असलेल्या रिपोन व्यापारी याने मोबाईलवर फोन करीत तुझा मुलगा माझ्या जवळ असून तू माझ्या सोबत राहायला ये, असे सांगितले. अस न केल्यास मुलाचे बरेवाईट करण्याची धमकी दिली. आरोपीने मुलाच्या आईस नाशिक येथे येण्यास सांगितले.

ही माहिती पोलिसांना मिळताच शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मुक्ता फडतरे व पोलीस पथकाने तातडीने पावले उचलत दोन पथक बनवून आरोपीस पकडण्यासाठी कारवाई सुरू केली. तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढण्यासाठी मुलाच्या आईसोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक मुक्ता फडतरे या स्वतः रेल्वेने नाशिक येथे पोहचल्या. तेथील रेल्वे स्टेशनच्या ब्रिजवर आरोपी रिपोन व्यापारी उभा असल्याचे आढळून आले. यानंतर महिला पोलीस अधिकारी मुक्ता फडतरे यांनी त्याच्या शिताफीने मुसक्या आवळल्या. व चिमुरड्याची सुटका करत पालकांच्या स्वाधीन केले.

RR VS LSG: सॅमसन आणि जुरेल यांनी केली नाबाद अर्धशतके! राजस्थानने लखनौचा 7 गडी राखून केला पराभव

IPL 2024 : मुंबई इंडियन्सविरोधात मॅकगर्क-स्टब्सचा झंझावात! शेवटच्या चेंडूवर दिल्लीनं जिंकला रंगतदार सामना

भाजपने मुंबई उत्तर-मध्य लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्यानंतर उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "राजकारणातून..."

कोल्हापूरच्या राजकीय आखाड्यातून PM मोदींचा 'मातोश्री'वर निशाणा; म्हणाले, आज बाळासाहेब असते, तर..."

उद्गीरमध्ये प्रियांका गांधींचा PM मोदींवर हल्लाबोल, म्हणाल्या; "पैशांच्या जोरावर महाराष्ट्रातील आमदारांना..."